शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

कारवाई योग्यच पण अतिक्रमणाला जबाबदार कोण?

By admin | Updated: May 23, 2015 02:52 IST

मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे.

सहायक आयुक्तांची जबाबदारी : आजवर कुणालाही जबाबदार धरले नाहीनागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबविली जात आहे. ही कारवाई योग्यच आहे परंतु अतिक्र मणावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे. त्यांना यासाठी जबाबदार का धरले जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी वेळीच कारवाई के ली असती तर आज महापालिका प्रशासनावर ही वेळी आलीच नसती. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील अक्रिमणाला आळा घालण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. शहरात अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. अतिक्रमण झाल्यास त्यांना जबाबदार धरले जात होते. अतिक्रमण कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांना देण्यात आले. गरज भासल्यास त्यांना पोलीस संरक्षणाची मागणी करता येते.जयस्वाल यांच्यानंतर श्याम वर्धने यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन उपायुक्त व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी धडक मोहीम राबविली होती. परंतु त्यांची बदली महसूल विभागात झाल्यापासून अतिक्रमण विरोधातील कार्यवाही जवळजवळ ठप्पच झाली आहे. मनपाकडे अतिक्रमणविरोधी पथक आहे. परंतु आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा मोहीम राबविली जाते. झोन कार्यालयाकडून अतिक्रमण करून बांधकाम झाल्यास कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)कठोर नियमाची गरज अतिक्रमणामुळे शहराचा चेहराचा विद्रुप होत आहे. अतिक्रमण करून कायमस्वरूपी बांधकाम केल्यास कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांना कारवाई करणे सोयीचे व्हावे, यासाठी कठोर नियमाची गरज असल्याचे मत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी व्यक्त केले.