शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

रेती तस्करांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

जगदीश जोशी नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ...

जगदीश जोशी

नागपूर : रेती तस्कराला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणे सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हुडकेश्वर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रेती तस्करांची वाहने पैसे घेऊन सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार सांभाळताच अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशानंतर कारवाई केल्यामुळे रेती तस्करी नियंत्रणात आली. काही दिवसांपासून पुन्हा रेती तस्करांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सूत जुळवून तस्करी सुरू केली. त्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी २ फेब्रुवारीला वाहतूक शाखेचे उपायुक्त, अजनी, सक्करदरा, कामठी विभागाचे निरीक्षक आणि कामठी, कळमना, पारडी, वाठोडा, नंदनवन, हुडकेश्वर तसेच बेलतरोडी ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फटकारत त्वरीत रेती तस्करी बंद करण्याचे निर्देश दिले.

शहरात भंडारा मार्ग, उमरेड मार्ग आणि कोराडी मार्गाकडून रेती तस्करीची वाहने प्रवेश करतात. ते रोखण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतात. रेती तस्कर रात्रीच्या वेळी पोलिसांचे खिसे भरून शहरात प्रवेश करतात. तैनात केलेले पोलीस एका रात्रीत मालामाल होतात. तेथे काही धोका असल्यास रेती तस्करांना आधीच सूचना दिली जाते. त्यामुळे ते पर्यायी मार्गाने वाहन घेऊन येतात. उमरेड मार्गाच्या विहीरगाव येथील पॉईंटवर तैनात सहायक उपनिरीक्षक प्रेमकुमार आणि शिपाई अश्विन रेती तस्करांच्या वाहनांना शहरात प्रवेश देत होते. याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना मिळाली. त्यांनी प्रकरणाचा तपास केला. दोषी आढळल्यानंतर दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी रेती तस्करांशी जुळले आहेत. त्यांची थेट बोलणी होते. रेती तस्करांशी संपर्क करण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक मोबाईल असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहिती आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

...........

दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची गरज

अवैध धंदे किंवा गैरकृत्यात सहभागी कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बदलीची कारवाई करण्यात येते. परंतु स्थानिक पातळीवर मजबुत पकड असल्यामुळे ही कारवाई पुरेशी नाही. बदली करण्यास काही अर्थ नसून निलंबन ठराविक कालावधीनंतर संपते. जानकारांच्या मते अशा कर्मचाºयांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करणे आवश्यक आहे. पुण्यातील चाकन ठाणे रेती तस्करीसाठी कुख्यात होते. तत्कालीन अधिक्षक संदिप पाटील यांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठवून रेती तस्करीतील तीन कर्मचाऱ्यांची धुळे येथे बदली केली होती. एका कर्मचाऱ्याने बदली स्विकारली तर दोघांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की कोणीही शहरात अवैध धंदे चालवू शकत नाही. निलंबनाच्या कारवाईनंतर पोलिसांनी आपले कृत्य न थांबविल्यास भविष्यात ठोस पावले उचलण्यात येतील.

...............