शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आचार्यश्रींच्या विचारांनी शक्ती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:50 IST

जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.

ठळक मुद्देअण्णा हजारे : रामटेक येथे घेतली विद्यासागरजी महाराज यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात अण्णा हजारे यांनी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना या ठिकाणी आल्याने शक्ती मिळाल्याचे सांगितले. सोबतच अलीकडे एअर कंडिशनमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊनही श्रीमंतांना झोप येत नाही. चांगले जीवन जगण्यासाठी आत्मिक समाधान महत्त्वाचे आहे, असेही हजारे म्हणाले. स्वदेशी, सेंद्रीय शेती, आरोग्य सुविधा, शिक्षण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.खादीमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता असल्याने या उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे, असे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.स्वदेशी, भ्रष्टाचार, खादी, सेंद्रीय शेती, खेड्यांची अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा यावर आचार्य विद्यासागरजी महाराज आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये गांभीर्याने चर्चा झाली. यावेळी अण्णा हजारे यांना खादीची वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. अमितभाई यांनी मध्यप्रदेशातील खादी उद्योगाविषयी अण्णा हजारे यांना माहिती दिली. मध्यप्रदेशात खादीचे ५० उद्योग उभारण्यात आले असून अशिक्षित आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तेथील शाळांमध्येही खादीच्या कापडांचा वापर गणवेश म्हणून करण्यात येतो, असे सांगितले.विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरेआचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर जैन मंदिर परिसरात चालविल्या जाणाºया प्रतिभास्थळी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत अण्णांनी चर्चा केली. तसेच विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना मार्गदर्शनही केले. अण्णा म्हणाले, शेजारी, गाव, देश या सर्वांच्या बाबतीत जो चांगला विचार करतो, असा माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. खोटे बोलू नका अशाप्रकारचे संस्कार मला माझ्या आईकडून मिळाले. मानवसेवा हीच माधवसेवा आहे. निष्काम सेवा करा. मी लग्न केले नाही तरी माझा परिवार मोठा आहे.भ्रष्टाचार केव्हा संपेल?विद्यार्थिनींशी चर्चा करताना एका विद्यार्थिनीने देशातील भ्रष्टाचार केव्हा संपेल, असा प्रश्न अण्णांना केला. त्यावर अण्णा म्हणाले, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खूप खोल आणि मजबूत आहे. ते संपविणे अशक्य आहे. परंतु गेल्या काही आंदोलनांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, हे वास्तव आहे. इंडिया कधी भारत होईल या प्रश्नाच्या उत्तरात स्वत:पासून सुरुवात करा नक्कीच देश भारत होईल, असे उत्तर अण्णांनी दिले. आम्ही देशासाठी काय करू शकतो, असा प्रश्न विद्यार्थिनीने विचारताच अण्णा म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात तेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करा. एखादी आजी स्वत: उठून पाणी भरू शकत नाही असे निदर्शनास आल्यास तिला एक मटका पाणी भरून आणून द्या, असे सांगितले. गाय हा राष्टÑीय प्राणी व्हावा आणि चलनावर गाईची प्रतिमा असावी, असेही अण्णा म्हणाले.