शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

आचार्यश्रींच्या विचारांनी शक्ती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:50 IST

जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.

ठळक मुद्देअण्णा हजारे : रामटेक येथे घेतली विद्यासागरजी महाराज यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे विचार समजून घेतल्याने दोन पावले पुढे चालण्याची शक्ती मिळाली, असे भावोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात अण्णा हजारे यांनी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना या ठिकाणी आल्याने शक्ती मिळाल्याचे सांगितले. सोबतच अलीकडे एअर कंडिशनमध्ये झोपेच्या गोळ्या घेऊनही श्रीमंतांना झोप येत नाही. चांगले जीवन जगण्यासाठी आत्मिक समाधान महत्त्वाचे आहे, असेही हजारे म्हणाले. स्वदेशी, सेंद्रीय शेती, आरोग्य सुविधा, शिक्षण याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.खादीमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता असल्याने या उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे, असे आचार्यश्री विद्यासागरजी महाराज म्हणाले.स्वदेशी, भ्रष्टाचार, खादी, सेंद्रीय शेती, खेड्यांची अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा यावर आचार्य विद्यासागरजी महाराज आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये गांभीर्याने चर्चा झाली. यावेळी अण्णा हजारे यांना खादीची वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. अमितभाई यांनी मध्यप्रदेशातील खादी उद्योगाविषयी अण्णा हजारे यांना माहिती दिली. मध्यप्रदेशात खादीचे ५० उद्योग उभारण्यात आले असून अशिक्षित आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तेथील शाळांमध्येही खादीच्या कापडांचा वापर गणवेश म्हणून करण्यात येतो, असे सांगितले.विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरेआचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्याशी चर्चा केल्यानंतर जैन मंदिर परिसरात चालविल्या जाणाºया प्रतिभास्थळी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत अण्णांनी चर्चा केली. तसेच विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना मार्गदर्शनही केले. अण्णा म्हणाले, शेजारी, गाव, देश या सर्वांच्या बाबतीत जो चांगला विचार करतो, असा माणूस निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. खोटे बोलू नका अशाप्रकारचे संस्कार मला माझ्या आईकडून मिळाले. मानवसेवा हीच माधवसेवा आहे. निष्काम सेवा करा. मी लग्न केले नाही तरी माझा परिवार मोठा आहे.भ्रष्टाचार केव्हा संपेल?विद्यार्थिनींशी चर्चा करताना एका विद्यार्थिनीने देशातील भ्रष्टाचार केव्हा संपेल, असा प्रश्न अण्णांना केला. त्यावर अण्णा म्हणाले, भ्रष्टाचाराची पाळेमुळे खूप खोल आणि मजबूत आहे. ते संपविणे अशक्य आहे. परंतु गेल्या काही आंदोलनांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, हे वास्तव आहे. इंडिया कधी भारत होईल या प्रश्नाच्या उत्तरात स्वत:पासून सुरुवात करा नक्कीच देश भारत होईल, असे उत्तर अण्णांनी दिले. आम्ही देशासाठी काय करू शकतो, असा प्रश्न विद्यार्थिनीने विचारताच अण्णा म्हणाले, तुम्ही विद्यार्थी आहात तेव्हा प्रामाणिकपणे अभ्यास करा. एखादी आजी स्वत: उठून पाणी भरू शकत नाही असे निदर्शनास आल्यास तिला एक मटका पाणी भरून आणून द्या, असे सांगितले. गाय हा राष्टÑीय प्राणी व्हावा आणि चलनावर गाईची प्रतिमा असावी, असेही अण्णा म्हणाले.