शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य विद्यासागरजी महाराज हे राष्ट्रमुनी, त्यांच्या शिकवणीवर जगाने चालावे!- सरसंघचालक भागवत

By योगेश पांडे | Updated: February 25, 2024 22:05 IST

आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप- डॉ. विजय दर्डा / आचार्यांना समाजातील सर्वच स्तरांतून विनयांजली अर्पण

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपल्या देशाचे मौलिक रत्न होते. त्यांच्या केवळ दर्शनानेच असंख्य लोकांच्या जीवनात स्थिरता यायची. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रमुनी होते. त्यांनी अध्यात्मापासून ते देशविकासापर्यंत विविध बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन करत पाथेय सादर केले होते. त्यांच्या शिकवणी व प्रेरणेच्या मार्गावर जगाने चालले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. प.पू.आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या समाधी महोत्सव श्रृंखलेत रविवारी चिटणीस पार्क येथे विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट तसेच सकल जैन समाजातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास ठाकरे, आ.प्रवीण दटके, उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियम सागर महाराज, सौम्य सागर महाराज, निष्पृह सागर महाराज, निश्चल सागर महाराज, निर्भीक सागर महाराज, निरागसागर महाराज, ओंकार सागर महाराज, संयम सागर महाराज उपस्थित होते. कठोर व्रताचरण करणारे विद्यासागरजी महाराज सर्वांचेच मार्गदर्शक होते. त्यांचे बोलणे तर्कसंगत असायचेच, याशिवाय त्यात आत्मियतेचा भावदेखील असायचा. त्यांच्याजवळ अर्धा तासदेखील कुणी बसले तर वर्षभर त्याचे मन स्थिर रहायचे. आपल्या देशाला इंडिया नको, भारत म्हणा हाच त्यांचा आग्रह असायचा.

स्व आधारित प्रणालीतूनच देशातील रोजगार वाढेल व देश विकसित होईल असे ते नेहमीच उपदेश करायचे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या समाधीमुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली. या प्रसंगी अध्यक्ष आनंद मौजिलाल, मंत्री आशीष पंचमलाल जैन, सतीश कोयलावाले, विनय अलादीन, सोनू जैन कोयलावाले, संतोष पेंढारी, सतीश पेंढारी, नितिन नखाते, संतोष ठेकेदार, अनिल जैन बीएसआर, प्रमोद जैन गुडलक, जय बड़कुर, मनीष जैन, जीतेन्द्र जैन, डॉ सुरेश मोदी, शीतल एमपीएसटी, सनत जैन वर्धावाले, अजय बड़कर, नितिन महाजन, मुकेश केवलवाले, अरविन्द जैन, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, अर्चना डेहनकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष नॅश अली, विहिंपचे अमोल ठाकरे, मनिष मेहता इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप : दर्डा

आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपण ज्यांची आराधना करतो असे केवळ संत नव्हते, तर ते प्रत्यक्ष ईश्वराचे मूर्त रूपच होते. आपण ईश्वराची केवळ कल्पना करतो. मात्र आचार्यांना भेटल्यावर ईश्वर नेमके असेच असतात हे लक्षात आले. १९९४ साली रामटेक येथे चातुर्मासादरम्यान त्यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले होते. त्यानंतर त्यांच्याशी निरंतर संपर्क राहिला. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन नेहमीच मिळाले. आचार्य आपल्यात नसले तरी ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहतील. त्यांचे उपदेश जगण्याचा मार्ग सांगणारे आहेत, या शब्दांत डॉ.विजय दर्डा यांनी विनयांजली अर्पण केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतVijay Dardaविजय दर्डा