शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आचार्य विद्यासागरजी महाराज हे राष्ट्रमुनी, त्यांच्या शिकवणीवर जगाने चालावे!- सरसंघचालक भागवत

By योगेश पांडे | Updated: February 25, 2024 22:05 IST

आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप- डॉ. विजय दर्डा / आचार्यांना समाजातील सर्वच स्तरांतून विनयांजली अर्पण

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपल्या देशाचे मौलिक रत्न होते. त्यांच्या केवळ दर्शनानेच असंख्य लोकांच्या जीवनात स्थिरता यायची. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रमुनी होते. त्यांनी अध्यात्मापासून ते देशविकासापर्यंत विविध बाबींवर वेळोवेळी मार्गदर्शन करत पाथेय सादर केले होते. त्यांच्या शिकवणी व प्रेरणेच्या मार्गावर जगाने चालले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. प.पू.आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या समाधी महोत्सव श्रृंखलेत रविवारी चिटणीस पार्क येथे विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट तसेच सकल जैन समाजातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास ठाकरे, आ.प्रवीण दटके, उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियम सागर महाराज, सौम्य सागर महाराज, निष्पृह सागर महाराज, निश्चल सागर महाराज, निर्भीक सागर महाराज, निरागसागर महाराज, ओंकार सागर महाराज, संयम सागर महाराज उपस्थित होते. कठोर व्रताचरण करणारे विद्यासागरजी महाराज सर्वांचेच मार्गदर्शक होते. त्यांचे बोलणे तर्कसंगत असायचेच, याशिवाय त्यात आत्मियतेचा भावदेखील असायचा. त्यांच्याजवळ अर्धा तासदेखील कुणी बसले तर वर्षभर त्याचे मन स्थिर रहायचे. आपल्या देशाला इंडिया नको, भारत म्हणा हाच त्यांचा आग्रह असायचा.

स्व आधारित प्रणालीतूनच देशातील रोजगार वाढेल व देश विकसित होईल असे ते नेहमीच उपदेश करायचे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या समाधीमुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, अशी भावना सरसंघचालकांनी व्यक्त केली. या प्रसंगी अध्यक्ष आनंद मौजिलाल, मंत्री आशीष पंचमलाल जैन, सतीश कोयलावाले, विनय अलादीन, सोनू जैन कोयलावाले, संतोष पेंढारी, सतीश पेंढारी, नितिन नखाते, संतोष ठेकेदार, अनिल जैन बीएसआर, प्रमोद जैन गुडलक, जय बड़कुर, मनीष जैन, जीतेन्द्र जैन, डॉ सुरेश मोदी, शीतल एमपीएसटी, सनत जैन वर्धावाले, अजय बड़कर, नितिन महाजन, मुकेश केवलवाले, अरविन्द जैन, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, अर्चना डेहनकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष नॅश अली, विहिंपचे अमोल ठाकरे, मनिष मेहता इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप : दर्डा

आचार्य विद्यासागरजी महाराज हे आपण ज्यांची आराधना करतो असे केवळ संत नव्हते, तर ते प्रत्यक्ष ईश्वराचे मूर्त रूपच होते. आपण ईश्वराची केवळ कल्पना करतो. मात्र आचार्यांना भेटल्यावर ईश्वर नेमके असेच असतात हे लक्षात आले. १९९४ साली रामटेक येथे चातुर्मासादरम्यान त्यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले होते. त्यानंतर त्यांच्याशी निरंतर संपर्क राहिला. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन नेहमीच मिळाले. आचार्य आपल्यात नसले तरी ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहतील. त्यांचे उपदेश जगण्याचा मार्ग सांगणारे आहेत, या शब्दांत डॉ.विजय दर्डा यांनी विनयांजली अर्पण केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतVijay Dardaविजय दर्डा