शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा

By admin | Updated: December 11, 2015 03:38 IST

राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार पाठवणार केंद्राला प्रस्ताव: चंद्रकांत पाटील यांची माहितीनागपूर : राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती देत राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भातील निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्यातील मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहेत. आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या अशासकीय प्रस्तावावर पाटील बोलत होते. बच्चू कडू यांनी आपल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून तो बैतूलला जोडण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, यामुळे दिल्लीचे अंतर १५० किलोमीटरने कमी होईल. मेळघाटसारख्या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कृषी उत्पादनासाठी बाजार उपलब्ध होईल. या मार्गावरून चालणारी रेल्वेगाडी शकुंतलेच्या दयनीय अवस्था विशद केली. इंग्रज देश सोडून गेल्यावरही त्यांनी २००६ पर्यंत या रेल्वेगाडीचे संचालन केले. मागील १० वर्षांपासून हा रेल्वेमार्ग ही गाडी भारतीय रेल्वेच्या ताब्यात आहे. परंतु आजपर्यंत त्याच्या विकासासाठी किंवा देखरेखीसाठी काहीच करण्यात आलेले नाही. या मार्गावरील सर्वच रेल्वेस्टेशन मोडकळीस आले आहे. कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानीही होऊ शकते, असेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रस्तावाला उत्तर देताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग आणि स्टेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असतात. राज्य सरकार त्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे या स्टेशनला विकसित करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाला विकसित करण्यासाठी सर्वे सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. मागणीसाठी ते आ. बच्चू कडू यांच्यासोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला जातील. या रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)