शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा

By admin | Updated: December 11, 2015 03:38 IST

राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार पाठवणार केंद्राला प्रस्ताव: चंद्रकांत पाटील यांची माहितीनागपूर : राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती देत राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भातील निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्यातील मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहेत. आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या अशासकीय प्रस्तावावर पाटील बोलत होते. बच्चू कडू यांनी आपल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून तो बैतूलला जोडण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, यामुळे दिल्लीचे अंतर १५० किलोमीटरने कमी होईल. मेळघाटसारख्या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कृषी उत्पादनासाठी बाजार उपलब्ध होईल. या मार्गावरून चालणारी रेल्वेगाडी शकुंतलेच्या दयनीय अवस्था विशद केली. इंग्रज देश सोडून गेल्यावरही त्यांनी २००६ पर्यंत या रेल्वेगाडीचे संचालन केले. मागील १० वर्षांपासून हा रेल्वेमार्ग ही गाडी भारतीय रेल्वेच्या ताब्यात आहे. परंतु आजपर्यंत त्याच्या विकासासाठी किंवा देखरेखीसाठी काहीच करण्यात आलेले नाही. या मार्गावरील सर्वच रेल्वेस्टेशन मोडकळीस आले आहे. कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानीही होऊ शकते, असेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले. या प्रस्तावाला उत्तर देताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग आणि स्टेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असतात. राज्य सरकार त्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे या स्टेशनला विकसित करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाला विकसित करण्यासाठी सर्वे सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. मागणीसाठी ते आ. बच्चू कडू यांच्यासोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला जातील. या रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)