शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

ट्रॅफिक सिग्नलअभावी अपघाताचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील पाेलीस लाईन परिसर, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक आदी परिसरातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील पाेलीस लाईन परिसर, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक आदी परिसरातील ट्रॅफिक सिग्नल बंद आहेत. परिणामी या ठिकाणी अपघाताचा धाेका बळावला असून, बेलगाम वाहतुकीवर आळा घालणे कठीण झाले आहे. वर्दळीच्या या चाैकात तात्काळ ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातून गेलेल्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस लाईन, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, ड्रॅगन पॅलेस भूमिगत मार्ग परिसरात वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. कामठी नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी गेल्या चार वर्षांपूर्वी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले हाेते. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. दरम्यान, नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने, या मार्गावरील वाहतूक सिग्नल प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले होते. तेव्हापासून हे ट्रॅफिक सिग्नल बंद असून, नेहमीच अपघात घडत आहेत. अपघातामुळे अनेकांना अपंगत्वसुद्धा आले आहे. या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले. असे असताना चाैकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे या भागात बेलगाम वाहतूक सुरू असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.