शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२२ मार्गांनी करता येतो अंबाझरी तलाव परिसरात प्रवेश : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 20:15 IST

हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.

ठळक मुद्देतातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाला देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, हिंगणा एमआयडीसी व वाडी येथील सांडपाणी मिसळत असल्यामुळे अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. नीरीचे तज्ज्ञ तलावातील पाण्याची तपासणी करणार आहे. त्याचा अहवाल व उपाययोजनांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. याशिवाय नीरी तलावात झपाट्याने वाढत असलेल्या जलवनस्पतीच्या निर्मूलनाचा मार्गही सांगणार आहे. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत तलाव परिसरात २० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, वन विभाग, महापालिकेच्या मदतीने तलावाचे खोलीकरण करणार असून त्यातून निघणारा गाळ झाडांच्या संवर्धनाकरिता वापरला जाणार आहे. न्यायालयाने हे सर्व मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणात १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे, वाडी नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.एसटीपीला मंजुरी केव्हाअंबाझरी तलावात सांडपाणी मिसळू नये याकरिता वाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारला जाणार आहे. त्याला किती दिवसात मंजुरी प्रदान करता अशी विचारणा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला केली व यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, प्रकल्पाचा प्रस्ताव कधी सादर करण्यात आला, प्रस्तावात असलेल्या त्रुटी इत्यादीची माहितीही प्राधिकरणला मागण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmbazari Lakeअंबाझरी तलाव