शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वीकार करताना, समजून घेताना पुरावे तपासणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

- स्वामी श्री. एम. : ‘अस्तित्व, अध्यात्म आणि तप’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येक गोष्टींसाठी प्रमाण ...

- स्वामी श्री. एम. : ‘अस्तित्व, अध्यात्म आणि तप’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्येक गोष्टींसाठी प्रमाण अर्थात पुराव्यांची गरज असते. प्रमाण असतील तर स्वीकारणे आणि समजून घेणे शक्य होत असल्याचे मत आध्यात्मिक गुरू, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि वक्ता श्री. एम. यांनी व्यक्त केले.

मंथनच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित व्याख्यानात ते ‘स्वत:चे अस्तित्त्व, अध्यात्म आणि तप’ या विषयावर बोलत होते. श्री. एम. यांचा जन्म केरळ येथील तिरुअनंतपुरम येथील एका मुस्लिम कुटुंबात झाला. बाल्यावस्थेपासून ते एका योग्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.

तुमच्यात सामर्थ्य असेल तर तुम्ही जे काही आरंभ करता ते ध्येयपूर्तीपर्यंत जाते. मात्र, या प्रवासात अनेक चढ-उतार असतील, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या प्रवासात उतार, अपयश दिसताच जरा थांबणे, विश्लेषण करणे आणि पुन्हा सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. भिन्न व्यक्ती भिन्न भिन्न समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र, त्यांच्या समस्यांमुळे त्यांना खचू न देताना त्यांना पुन: प्रवाहात आणावे, असे आवाहन श्री. एम. यांनी यावेळी केले. कार्यक्रमात श्री. एम. यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. तुम्ही एखादा मार्ग सोडला तर तो का सोडला किंवा त्या मार्गावरचा आनंद तुम्हाला वेगळ्याने कसा प्राप्त झाला, ही गोष्ट समजावून सांगता आली पाहिजे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की संन्यासी बनल्यानेच आध्यात्मिक होता येत नाही तर आध्यात्मिक मार्ग कसाही प्राप्त करता येऊ शकतो. त्यासाठी एक थांबा आवश्यक असतो. दररोजच्या कर्मातून काही वेळेची विश्रांती आणि विश्लेषण तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाते, असे ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, मंथनचे समन्वयक सतीश सारडा यांनी प्रास्ताविक केले. प्रश्नोत्तराच्या सत्राचे समन्वयन रोहन पारेख यांनी केले. निवेदन अंकिता देशकर यांनी केले.

-------------------

केरळमध्ये आता सांप्रदायिक सौहार्द्र

केरळमध्ये आता सांप्रदायिक सौहार्द्र निर्माण झाले असून, राजकीय विचारधारा संसदेसाठी असून हिंसाचारासाठी नव्हे, असे श्री. एम. खासगीमध्ये झालेल्या चर्चेत म्हणाले. राजकीय हिंसा रोखण्यासाठी तरुणांची मोठी भूमिका महत्त्वाची आहे. केरळमध्ये पूर्वी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रक्तपात घडला होता. हा हिंसाचार रोखण्यासाठी मला मध्यस्थी करावी लागली आणि दोन्हींकडून यासाठी पुढाकार घेतला गेला. आता तेथे सामाजिक सौहार्द्र नांदत असल्याचे श्री. एम. म्हणाले.

............