शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पदभार स्वीकारण्यापूर्वीच गडकरी ‘अ‍ॅक्टिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:15 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपुरात जाणून घेतल्या सिंचन विभागातील समस्या : तज्ज्ञांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपल्या ‘हटके’ कार्यप्रणालीसाठी परिचित असलेले गडकरींनी पदभार स्वीकारण्याअगोदरच आपल्या अभ्यासू वृत्तीने कामाला सुरुवात केली. रविवारीच त्यांनी सिंचन तज्ज्ञांशी चर्चा केली आणि विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.गडकरी यांचा सिंचन प्रकल्पांवर अगोदरपासूनच अभ्यास आहे. मंत्री नसतानादेखील या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. नवी दिल्लीत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गडकरी रविवारी नागपूरला आले. निवासस्थानी निवांत वेळ न घालवता त्यांनी तातडीने सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांना तसेच विभागातील अधिकाºयांना बोलावून घेतले. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत येणाºया प्रकल्पांची स्थिती, गोसेखुर्दसमोरील आव्हाने तसेच भूजलपातळी वाढविण्यासंबंधी उचलण्यात आलेली पावले यासंदर्भात जाणून घेतले. या कामांना गती देण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आवश्यक आहे याबाबतदेखील त्यांनी तज्ज्ञांचे विचार ऐकले. राज्यातील २६ प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पांना एकूण १८ हजार ६५४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यात केंद्र शासनाचा वाटा हा १० हजार ६१५ कोटी ६२ लाख ९० हजार इतका आहे हे विशेष.रविवारी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचा व मांडलेल्या अडचणींचा अभ्यास केला. सोमवारी सकाळी ते नवी दिल्लीकडे रवाना झाले.मात्र अगोदरच अभ्यासू वृत्ती असलेले गडकरी विभागाचा गृहपाठ करून पदभार स्वीकारण्यासाठी गेले असल्यामुळे या विभागातदेखील ते धडाकेबाज कामगिरी करून दाखवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.