शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

आॅटिझमचा स्वीकार होणे महत्त्वाचे

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही.

अभिमन्यू निसवाडे : मनोचिकित्सा विभाग व ‘आयएपी’तर्फे ‘आॅटिझम’ दिन साजरानागपूर : ‘आॅटिझम’(स्वमग्न) हा आज काही सर्वसामान्यांसाठी तितका म्हणजे पूर्णपणे अनोळखी, अपरिचित शब्द उरलेला नाही. पण तरीही मुलाला आॅटिझम असल्याचे कळेपर्यंत हा शब्दही ऐकला नव्हता, ही प्रतिक्रिया आजही सर्रास ऐकायला मिळते. या आजाराविषयी जागरुकतेची तितकीच गरज आहे. नुसती आजाराची माहिती असणे पुरेसे नाही, तर आता समाजात या आॅटिझमचा स्वीकार होणेही महत्त्वाचे आहे. यासाठी डॉक्टरांसह प्रत्येक व्यक्तीने मूल जन्मल्यानंतर पुढील सहा महिन्यात आजाराचे निदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मनोचिकित्सा विभाग, इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स (आयएपी) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी जागतिक आॅटिझम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख व आयएपीचे अध्यक्ष डॉ. सी.एम.बोकडे, मनोचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले, डॉ. मनीष ठाकरे, आयएपीचे सचिव डॉ. डहाके व ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या संचालिका ज्योती फडके उपस्थित होत्या.डॉ. निसवाडे म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर सहा महिन्यात या आजाराचे निदान झाल्यास पालक, सायकॉलिजिस्ट व विशेष शाळेच्या मदतीने दिली जाणारी बिहेविअर थेरपी व त्यांचे संवाद, भाषा, सामाजिक वर्तणूक सुधारण्यासाठी दिले जाणारे ट्रेनिंग फायद्याचे ठरते. परंतु आजार कळेपर्यंतच ५ ते ७ वर्षे उलटलेली असतात. अशा मुलांमध्ये ज्या चांगल्या स्किल्स असतात, त्यांना चालना देण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर सहभागी तज्ज्ञांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. डॉ. सुधीर महाजन यांनी आॅटिझम आणि निदान यावर मार्गदर्शन केले. डॉ. उर्मिला चव्हाण यांनी आॅटिझममध्ये येणारे इतर आजार व उपचाराची माहिती दिली. डॉ. सोफिया आसाद यांनी आॅटिझमवर आॅक्युपेशनल उपचार पद्धतीची माहिती दिली. ‘संवेदना स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ आॅटिझम’च्या डॉ. मृणालिनी बल्लाळ व डॉ. लक्ष्मी सांबरे यांनी शाळेची माहिती देऊन, विद्यार्थ्यांचा कसा विकास साधला जातो यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. श्रेयस मागीया व डॉ. प्रांजली भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीष ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)