शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
8
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
9
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
10
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
11
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
12
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
13
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
14
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
15
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
20
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?

नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

By admin | Updated: September 5, 2016 02:34 IST

नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका.

शिवाजीराव बोडखे यांचे आवाहन : सहलीवरून परतलेल्या आदिवासी मुलामुलींचा सत्कारनागपूर : नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका. आदिवासी नागरिकांनी नक्षलींविरुद्ध शस्त्र घेऊन लढावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. त्यांनी केवळ विकासाचा मार्ग स्वीकारला तरी, नक्षली पराभूत होतील असे मत नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी व्यक्त केले.गडचिरोली पोलीस व गडचिरोली जिल्हा आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलामुलींसाठी आपला महाराष्ट्र सहल आयोजित करण्यात आली होती. या मुलामुलींचा व ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा रविवारी बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे मैत्री परिवार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते व्यासपीठावर उपस्थित होते. सहलीमध्ये ४३ मुले व ३८ मुली सहभागी झाल्या होत्या. मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर हे मुलेमुली रविवारी नागपुरात आले होते. देश झपाट्याने बदलत असताना आदिवासी समाज मात्र आजही विकासापासून दूर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकार सांगून व जीवनभर जंगलात राहून काहीच साध्य होणार नाही. या विचारामुळे पुढील अनेक पिढ्या मागासलेल्याच राहतील. यामुळे जंगलातून बाहेर पडा. महाराष्ट्र सहल हा उपक्रम आदिवासी मुलामुलींना विकासाचे दर्शन घडविण्यासाठी आहे. हा धागा पकडून पुढे जा. स्वत:सह इतरांनाही जागृत करा. सर्वांना उच्च पदाची नोकरी मिळविता येणार नाही, पण चांगला नागरिक निश्चितच होता येईल असेही बोडखे यांनी सांगितले. आदिवासी मुलामुलींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सहलीच्या निमित्ताने चांगली परंपरा सुरू झाली आहे. सतत नवीन शिकण्याची जिद्द ठेवणारी व्यक्तीच पुढे जाते. स्वत:ला पूर्ण समजणाऱ्याचा विकास थांबतो. जगात साध्या लोकांनीच क्रांती केली आहे असे मत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले.भुसारी यांनी करिअरवर मार्गदर्शन केले. शिल्पा बेलादे व रोहित कोळसा यांनी सहलीचे अनुभव सांगितले. सुरुवातीला सुरसंगमच्या कलावंतांनी देशभक्तिपर व प्रेरणादायी गीते सादर केलीत. नखाते यांनी प्रास्ताविक तर, भुवनेश्वरी परशुरामकर यांनी संचालन केले. मनोज बंड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)