शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नक्षलींना हरविण्यासाठी विकासाचा मार्ग स्वीकारा

By admin | Updated: September 5, 2016 02:34 IST

नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका.

शिवाजीराव बोडखे यांचे आवाहन : सहलीवरून परतलेल्या आदिवासी मुलामुलींचा सत्कारनागपूर : नक्षली जल, जमीन व जंगलावर अधिकार सांगून दिशाभूल करतात. त्यांच्या कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नका. आदिवासी नागरिकांनी नक्षलींविरुद्ध शस्त्र घेऊन लढावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. त्यांनी केवळ विकासाचा मार्ग स्वीकारला तरी, नक्षली पराभूत होतील असे मत नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी व्यक्त केले.गडचिरोली पोलीस व गडचिरोली जिल्हा आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलामुलींसाठी आपला महाराष्ट्र सहल आयोजित करण्यात आली होती. या मुलामुलींचा व ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा रविवारी बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे मैत्री परिवार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, डॉ. नरेंद्र भुसारी व संजय नखाते व्यासपीठावर उपस्थित होते. सहलीमध्ये ४३ मुले व ३८ मुली सहभागी झाल्या होत्या. मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्यानंतर हे मुलेमुली रविवारी नागपुरात आले होते. देश झपाट्याने बदलत असताना आदिवासी समाज मात्र आजही विकासापासून दूर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर अधिकार सांगून व जीवनभर जंगलात राहून काहीच साध्य होणार नाही. या विचारामुळे पुढील अनेक पिढ्या मागासलेल्याच राहतील. यामुळे जंगलातून बाहेर पडा. महाराष्ट्र सहल हा उपक्रम आदिवासी मुलामुलींना विकासाचे दर्शन घडविण्यासाठी आहे. हा धागा पकडून पुढे जा. स्वत:सह इतरांनाही जागृत करा. सर्वांना उच्च पदाची नोकरी मिळविता येणार नाही, पण चांगला नागरिक निश्चितच होता येईल असेही बोडखे यांनी सांगितले. आदिवासी मुलामुलींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र सहलीच्या निमित्ताने चांगली परंपरा सुरू झाली आहे. सतत नवीन शिकण्याची जिद्द ठेवणारी व्यक्तीच पुढे जाते. स्वत:ला पूर्ण समजणाऱ्याचा विकास थांबतो. जगात साध्या लोकांनीच क्रांती केली आहे असे मत पोरेड्डीवार यांनी व्यक्त केले.भुसारी यांनी करिअरवर मार्गदर्शन केले. शिल्पा बेलादे व रोहित कोळसा यांनी सहलीचे अनुभव सांगितले. सुरुवातीला सुरसंगमच्या कलावंतांनी देशभक्तिपर व प्रेरणादायी गीते सादर केलीत. नखाते यांनी प्रास्ताविक तर, भुवनेश्वरी परशुरामकर यांनी संचालन केले. मनोज बंड यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)