शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

विद्यापीठाचे ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’ संकटात

By admin | Updated: June 25, 2015 03:02 IST

अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागलेले नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची सूचना काढली आहे.

नागपूर : अंतिम वर्षाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागलेले नसताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची सूचना काढली आहे. निकाल उशिरा लागणार असल्यामुळे साहजिकच प्रवेश उशिरा होतील व पर्यायाने वर्गदेखील उशिरा सुरू होतील. यामुळे ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’ कसे पाळले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अवघ्या २० महाविद्यालयांमुळे ‘बीएस्सी’च्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे.अनेक महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यापीठाला पाठविलेलेच नाही. त्यामुळे अंतिम वर्षाचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. याबाबत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आणखी काही बाबी स्पष्ट केल्या. ‘बीएस्सी’च्या २० महाविद्यालयांनी हे गुण पाठविलेले नाही. त्यामुळे हे निकाल प्रलंबित होते. परंतु केवळ २० महाविद्यालयांसाठी सर्व विद्यार्थ्यांचे निकाल रोखू नका, असे स्पष्ट निर्देश परीक्षा विभागाला देण्यात आले आहेत. संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे निकाल मात्र रोखण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कला व वाणिज्य शाखेच्या निकालाची ‘स्क्रूटिनी’ राहिली होती. परंतु ती आता झाली असून लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, बुधवारी विद्यापीठाने विविध विभागांमधील ४७ अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची सूचना अधिकृतपणे जाहीर केली. परंतु अंतिम वर्षाचे निकालच लागले नसल्याने हे प्रवेश कधी होतील, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासूनच सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप निकालच लागले नसल्याने पुढील वर्ग सुरू झालेलेच नाही. अशास्थितीत ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’ यंदा तरी तंतोतंत पाळल्या जाणार नाही, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)