शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

परीक्षा दिल्यानंतरदेखील दाखविले अनुपस्थित; २२ विद्यार्थी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे एलएलएमच्या चौथ्या सत्रातील २२ विद्यार्थी प्रचंड तणावात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे एलएलएमच्या चौथ्या सत्रातील २२ विद्यार्थी प्रचंड तणावात आले आहेत. परीक्षा दिल्यावरदेखील त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले व अनुत्तीर्ण म्हणून त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. सुधारित निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांची पीएच.डी. नोंदणीसाठी आवश्यक असलेली पेट देण्याची संधी गेली आहे.

एलएलएमच्या चौथ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये झाली व ९ जुलै रोजी निकाल घोषित झाला. २२ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. विद्यापीठाला तक्रार करण्यात आली व त्यांचा दावा योग्य असल्याचे सिद्धदेखील झाले. जुनी गुणपत्रिका देऊन आठवडाभरात नवीन गुणपत्रिका घेऊन जाण्याबाबत परीक्षा विभागातून सांगण्यात आले. आतापर्यंत विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका मिळालेली नाही. परीक्षा विभागात त्यांना काही ना काही कारणे सांगून परत पाठविले जात आहे.

मागील एका महिन्यापासून हे विद्यार्थी लवकर निकाल लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना गंभीरतेने घेतलेलेच नाही. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनादेखील विद्यार्थ्यांनी संपर्क केला. मात्र साबळे विद्यार्थ्यांना भेटलेही नाही व त्यांचे फोनदेखील उचलले नाही. एसएमएसचे उत्तर देण्याची तसदीदेखील साबळे यांनी घेतली नाही. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.