शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

अजनी आरक्षण कार्यालयात आरपीएफची अनुपस्थिती

By admin | Updated: May 15, 2014 02:39 IST

उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढली आहे. सर्व प्रवाशांना वेटींगचे तिकीट हातात मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत.

नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढली आहे. सर्व प्रवाशांना वेटींगचे तिकीट हातात मिळत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलालही सक्रिय झाले असताना अजनी रेल्वे आरक्षण कार्यालयात मात्र दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसत आहे.उन्हाळ्यात नागपुरातून चारही दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यात प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणार्‍या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना तिकीट खरेदीसाठी गेल्यानंतर हाती वेटींग असलेले तिकीट पडत आहे. यामुळे कुटुंबासह कसा प्रवास करावा, असा प्रश्न त्यांना पडत आहे. यामुळे अनेक प्रवासी दलालांकडे जाऊन कन्फर्म तिकीट मिळते काय याची चाचपणी करीत आहेत. रेल्वे अँक्ट १४३ नुसार रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणे गुन्हा आहे. अशा व्यक्तीला दंड आणि तुरुंगवासाची तरतूद या कायद्यात आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल कार्यरत आहे. परंतु अजनीच्या आरक्षण कार्यालयात फेरफटका मारला असता तेथे कुठल्याच आरपीएफ जवानाची ड्युटी नसल्याचे अनेकदा आढळले. यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांचे चांगलेच फावत आहे.आरक्षण कार्यालयात त्यांना अटकाव करण्यासाठी कुणीच उपस्थित राहत नसल्यामुळे अजनीच्या आरक्षण कार्यालयात दलालांच्या कारवाया वाढीस लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अजनी आरक्षण कार्यालयात दलालांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आरपीएफ जवानांची नेमणूक करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)