शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

लसीकरणासाठी सीएसआरमधून तब्बल २०० ‘सद्भावना जीवनरथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:10 IST

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ठेवत महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या ...

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ठेवत महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या सीएसआर निधीतून विदर्भ सहायता सोसायटीने विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने ‘सद्भावना जीवनरथ’ उपलब्ध करून दिले. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला व सर्वात मोठा उपक्रम ठरला आहे.

२०० सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवारी मानकापूर क्रीडा संकुलात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दृक्श्राव्य पद्धतीने सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आ. राजू पारवे, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे उपस्थित होते. याशिवाय आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे हे दृक्श्राव्य पद्धतीने सहभागी झाले होते.

यावेळी मिशन लसीकरण अभियानाची सुरुवातही करण्यात आली. विदर्भातील एका तालुक्याला प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे ही दोनशे वाहने दिली जातील. नागपूर विभागासाठी १२८ तर अमरावती विभागासाठी ७२ लसीकरण वाहने हस्तांतरित करण्यात आली. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याचे सांगत देशानेच नव्हे तर जगाने याची नोंद घ्यावी, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नितीन राऊत यांनी लसीकरण वाहनांच्या माध्यमातून मेळघाट, गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात पाेहोचून लसीकरणासह आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविक विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. संचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले तर जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आभार मानले.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणच पर्याय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.