शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी सीएसआरमधून तब्बल २०० ‘सद्भावना जीवनरथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:10 IST

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ठेवत महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या ...

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव ठेवत महापारेषण कंपनीने दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या सीएसआर निधीतून विदर्भ सहायता सोसायटीने विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने ‘सद्भावना जीवनरथ’ उपलब्ध करून दिले. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला व सर्वात मोठा उपक्रम ठरला आहे.

२०० सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे हस्तांतरण शुक्रवारी मानकापूर क्रीडा संकुलात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दृक्श्राव्य पद्धतीने सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमाला ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आ. राजू पारवे, मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे उपस्थित होते. याशिवाय आरोग्य मंत्री राजेश टोपे, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे हे दृक्श्राव्य पद्धतीने सहभागी झाले होते.

यावेळी मिशन लसीकरण अभियानाची सुरुवातही करण्यात आली. विदर्भातील एका तालुक्याला प्रत्येकी दोन वाहने याप्रमाणे ही दोनशे वाहने दिली जातील. नागपूर विभागासाठी १२८ तर अमरावती विभागासाठी ७२ लसीकरण वाहने हस्तांतरित करण्यात आली. खास लसीकरणासाठी तब्बल २०० वाहने उपलब्ध करून देण्याचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याचे सांगत देशानेच नव्हे तर जगाने याची नोंद घ्यावी, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नितीन राऊत यांनी लसीकरण वाहनांच्या माध्यमातून मेळघाट, गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात पाेहोचून लसीकरणासह आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रास्ताविक विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. संचालन उपायुक्त आशा पठाण यांनी केले तर जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आभार मानले.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणच पर्याय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.