शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

सामान्य घरातून पुढे आले सक्षम नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:09 IST

धनंजय कापसीकर लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याच आरक्षणामुळे ...

धनंजय कापसीकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याच आरक्षणामुळे सामान्य घरांमधील महिलांमध्ये असलेले नेतृत्वगुण विकसित व्हायला सुरुवात झाली. कन्हान (ता. पारशिवनी) येथील नगराध्यक्ष करुणा आष्टनकर या यापैकीच एक. त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्या राजकीय प्रवाहात आल्या. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावल्याने त्यांनी जनतेचा विश्वासही संपादन केला.

निवडणूक जिंकायची म्हटली तर अमाप पैसा खर्च करण्याची आर्थिक क्षमता असायला हवी. परंतु, करुणा आष्टनकर यांच्याबाबतीत हे समीकरण चूक ठरले. घरी छाेटेसे किराणा दुकान असल्याने त्या शिवणकाम करून संसाराला हातभार लावायच्या. मात्र, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा गुण नागरिकांना आवडला. हा गुण आपल्या आई सुमित्राबाई अंबागडे यांच्याकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या समस्या साेडविण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.

ठिय्या आंदाेलनाला यश आल्याने नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी २००८ साली कन्हान ग्रामपंचायतची पहिल्यांदा निवडणूक लढविली. परंतु, त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. परंतु, त्यांनी या अपयशामुळे खचून न जाता लाेककार्य सुरूच ठेवले. पुढे २०१२ च्या निवडणुकीत त्या पंचायत समितीमध्ये पाेहाेचल्या. यावेळी त्यांना अडीच वर्षे सभापतिपदही मिळाले. पुढे कन्हान ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले. नगरपालिकेत नगरसेवकपदी सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येण्याचा मानही मतदारांनी त्यांना दिला. सन २०२० मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडले. इतर क्षेत्राप्रमाणे नागरिकांच्या समस्या साेडविण्यातही महिला मागे नाहीत. ग्रामीण भागातील महिलांनी मनात भीती न बाळगता देशसेवेसाठी पुढे यायला हवे. यातून महिलांचे सबलीकरण हाेऊ शकते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

...

पाणी समस्या व ठिय्या आंदाेलन

कन्हान शहरातील धरमनगरात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली. ही समस्या निर्माण झाली, त्यावेळी कन्हान ग्रामपंचायत हाेती. ही समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी पदर खाेचून महिलांना गाेळा केले आणि ग्रामपंचायत कार्यालयासमाेर ठिय्या आंदाेलनाला सुरुवात केली. त्यांच्या या आंदाेलनाला यश आले. त्यांनी पाण्यासाेबतच इतर मागण्याही पूर्ण करवून घेतल्या. या आंदाेलनात त्यांच्यातील नेतृत्वगुण प्रकर्षाने दिसून आले.