शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’ने सुरू केली भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन

By admin | Updated: July 23, 2015 03:07 IST

सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो.

पंकज गुप्ता यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांच्या तक्रारी सोडविणारनागपूर : सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो. यापुढे सरकारी कार्यालयातून नागरिकांची कामे वेळेत होत नसतील तर थेट आम आदमी पार्टी नागपूर शहरतर्फे सुरू करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी नागरिकांना केले. आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनचा शुभारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते झाला. या हेल्पलाईनचा क्रमांक ९४४५०७७२२२ हा आहे. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पंकज गुप्ता म्हणाले की, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती जनतेचे काम करण्यासाठी झाली आहे. मात्र हे कर्मचारी पैशाशिवाय जनतेचे कुठलेही काम करीत नाही. सरकारी कार्यालयात जनतेचे कुठलीही कामे वेळेत करून मिळत नाही. कार्यालयातील कर्मचारी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देतात. छोट्या छोट्या कामासाठी उद्या या, नंतर या असे सांगून त्रास देतात. त्यामुळे त्रस्त होऊन नागरिक दलालांकडे जातो. दलाल नागरिकांकडून पैसे घेऊन तत्काळ काम करवून देतात. हा प्रकार प्रत्येक सरकारी कार्यालयात सर्रास होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार केल्यास आपचे कार्यकर्ता थेट सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार आहे. यासाठी नागरिकांचा सहयोग अपेक्षित आहे. या प्रकारामुळे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुश राहणार आहे. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखेडे, सचिव जगजितसिंग, नागपूर समन्वयक अशोक मिश्रा, सचिव कविता सिंगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकरी विकासासाठी स्वामीनाथन आयोग लागू कराआम आदमी पार्टीच्यावतीने विदर्भात शेतकरी-शेतमजूर संवाद यात्रा काढून, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला लागत मूल्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने, महत्त्वाचे कारण पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आप आर्थिक मदत करणार आहे. मनपा निवडणूक लढण्याचा अद्यापही विचार नाहीआम आदमी पार्टी संघटना मजबूत करण्यासाठी बूथ लेव्हलवर क्रियाशील आहे. शहरात कार्यकर्ता जोडण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १८१० बूथपैकी आपचे १००० बूथ झाले आहेत. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची आहे. जनता जोपर्यंत आमच्यासोबत येणार नाही तोपर्यंत निवडणूक लढविण्याचा आपचा विचार नसल्याचे पंकज गुप्ता म्हणाले.