शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘आप’ने सुरू केली भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन

By admin | Updated: July 23, 2015 03:07 IST

सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो.

पंकज गुप्ता यांच्या हस्ते शुभारंभ : नागरिकांच्या तक्रारी सोडविणारनागपूर : सरकारी-निमसरकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना कामकाजासाठी विनाकारण त्रास देण्यात येतो. यापुढे सरकारी कार्यालयातून नागरिकांची कामे वेळेत होत नसतील तर थेट आम आदमी पार्टी नागपूर शहरतर्फे सुरू करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी नागरिकांना केले. आम आदमी पार्टीच्या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनचा शुभारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते झाला. या हेल्पलाईनचा क्रमांक ९४४५०७७२२२ हा आहे. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना पंकज गुप्ता म्हणाले की, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती जनतेचे काम करण्यासाठी झाली आहे. मात्र हे कर्मचारी पैशाशिवाय जनतेचे कुठलेही काम करीत नाही. सरकारी कार्यालयात जनतेचे कुठलीही कामे वेळेत करून मिळत नाही. कार्यालयातील कर्मचारी त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्रास देतात. छोट्या छोट्या कामासाठी उद्या या, नंतर या असे सांगून त्रास देतात. त्यामुळे त्रस्त होऊन नागरिक दलालांकडे जातो. दलाल नागरिकांकडून पैसे घेऊन तत्काळ काम करवून देतात. हा प्रकार प्रत्येक सरकारी कार्यालयात सर्रास होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी आपने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार केल्यास आपचे कार्यकर्ता थेट सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाब विचारणार आहे. यासाठी नागरिकांचा सहयोग अपेक्षित आहे. या प्रकारामुळे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारावर अंकुश राहणार आहे. पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखेडे, सचिव जगजितसिंग, नागपूर समन्वयक अशोक मिश्रा, सचिव कविता सिंगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकरी विकासासाठी स्वामीनाथन आयोग लागू कराआम आदमी पार्टीच्यावतीने विदर्भात शेतकरी-शेतमजूर संवाद यात्रा काढून, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला लागत मूल्यापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने, महत्त्वाचे कारण पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आप आर्थिक मदत करणार आहे. मनपा निवडणूक लढण्याचा अद्यापही विचार नाहीआम आदमी पार्टी संघटना मजबूत करण्यासाठी बूथ लेव्हलवर क्रियाशील आहे. शहरात कार्यकर्ता जोडण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १८१० बूथपैकी आपचे १००० बूथ झाले आहेत. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची आहे. जनता जोपर्यंत आमच्यासोबत येणार नाही तोपर्यंत निवडणूक लढविण्याचा आपचा विचार नसल्याचे पंकज गुप्ता म्हणाले.