शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल मुक्तीसाठी आमीर खानला साकडे

By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST

‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’

सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचा प्रयत्न : जनजागृतीसाठी निवेदननागपूर : ‘सिकलसेल सोसायटी आॅफ इंडिया’ सिकलसेल मुक्त भारत बनविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून या सोसायटीचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामधून या आजाराची जनजागृती करण्यात यावी, यासाठी अभिनेते आमीर खान यांना साकडे घातले आहे. सिकलसेल हा आजार १९१०मध्ये निदर्शनास आला. अमेरिका, आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांमध्ये आजाराचा प्रभाव पाहायला मिळाला. मागील १०४ वर्षे होऊनही हा आजार नष्ट होण्यावर औषध उपलब्ध नाही. ‘सिकलसेल’ हा आजार केवळ बाळाच्या जन्मानंतर या एकच माध्यमातून वाढतो. त्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातूनच सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला सामाजिक आरोग्य समस्या म्हणून घोषित केले असून, जगातील घातक आजारांच्या श्रेणीत या आजाराचा समावेश केला आहे. १९५२ पासून आजपर्यंत १२ राज्यांमध्ये आढळून आलेल्या या आजाराने १० लाखांपेक्षा जास्त कुटुंबाला अडचणीत आणले आहे. आजार व सर्वेक्षणावर केंद्र शासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु, नियंत्रणासाठी ६७ वर्षांनंतरही केंद्र व राज्य शासनाकडून योग्य पावले उचलण्यात आली नाही. आमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समस्या व नागरिकांच्या हितासाठी जनजागृती केली जाते. सिकलसेल आजाराबाबतही जनजागृती व्हावी यासाठी सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी अभिनेते आमीर खान यांची मुंबईत भेट घेऊन सिकलसेल आजाराविषयीची माहिती दिली. यावर खान यांनी, ‘सिकलसेल माझ्यासाठी नवीन आरोग्य समस्या असून, इतर मार्गांनी माहिती घेईल’ असे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)