शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

२० एप्रिल रोजी दुर्लभ हायब्रीड सूर्यग्रहण; पण भारतातून दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 20:16 IST

Nagpur News खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही.

नागपूर : खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही; पण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा आनंद घेता येईल. सूर्यग्रहण दिसणार नसले तरी खगाेलप्रेमींना २२ व २३ राेजी लायरिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मात्र मिळणार आहे.

२० राेजीचे सूर्यग्रहण दक्षिण पॅसिफिक महासागरातून दिसेल. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरुवात होईल. पुढे पाश्चिम आॅस्ट्रेलियाच्या ठिकाणी, पापुआंगिनी, इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरुवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर मध्य काळात हे ग्रहण खग्रास दिसेल. एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात.

पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि कमी-अधिक उंची/अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पाहावयास मिळते. दशकातून एखाद्या वेळेसच असे दुर्मीळ हायब्रीड सूर्यग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ ३ टक्के असते. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राशीत घडणार आहे. संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिटांचे असेल.

दरवर्षी २२, २३ एप्रिलदरम्यान दिसणारा लायरीड उल्कावर्षाव यावर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखेदरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ रोजी मोठ्या संख्येने दिसतो अशी माहिती, रमन विज्ञान केंद्राचे महेंद्र वाघ यांनी सांगितली.

उल्कावर्षाव पाहता येणार...

उत्तर-पूर्व दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समूहात वेगा ताऱ्याजवळ हा उल्कावर्षाव पाहता येईल. रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत हा चांगला दिसू शकेल. ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकतील, असा अंदाज आहे. हा उल्कावर्षाव थॅचर धूमकेतूमुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खूप मोठा उल्कावर्षाव दिसणार आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण