शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

नागपूर बोर्डाचे दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष मंगेश व्यवहारे नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम ...

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष

मंगेश व्यवहारे

नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम शाळांनीच केले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी मूल्यांकन केले आहे. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच मूल्यांकनाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, मंडळाने निकालाच्या प्रक्रियेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडे डाटा पाठविला आहे.

शाळांना मूल्यांकनासाठी ११ ते ३० जून हा कालावधी देण्यात आला होता. मूल्यांकन करताना शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य, आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या होत्या. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यायचे होते. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरायचे होते. नियमित विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी काही शाळांना मूल्यांकन करताना काही त्रुटी भेडसावल्या; पण बोर्डाकडून केलेल्या मार्गदर्शनामुळे त्या त्रुटी दूर करण्यात आल्या. पुनर्परीक्षार्थ्यांच्या मूल्यांकनात आलेल्या त्रुटी बोर्ड अजूनही सोडवीत आहे. त्यामुळे निकाल घोषित करण्यास वेळ लागतो आहे. परिणामी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

- नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे परीक्षार्थी

एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२

पुनर्परीक्षार्थी - ५८९८

- ६९० पुनर्परीक्षार्थ्यांच्या त्रुटी काढण्याचे काम सुरू

दहावीच्या परीक्षेत ५८९८ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी होते. यातील १३८२ विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात बोर्डाला त्रुटी आढळल्या. शाळेने या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना स्कूल रेकॉर्डनुसार मूल्यांकन केले नव्हते. यातील ६९२ विद्यार्थ्यांच्या त्रुटी बोर्डाने काढल्या आहेत. हा प्रकार सर्वच विभागीय मंडळांना भेडसावत आहे.

- शाळांनी केलेल्या मूल्यांकनात गणित आणि विज्ञान विषयाचे गुणदान करताना झालेल्या दुर्लक्षामुळे काही अडचणी आल्या. बहुतांश शाळांनी योग्यच गुणदान केले. पण पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत गुणदान करताना भरपूर त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्रुटी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही शाळा त्रुटी पूर्ण करू शकल्या नाहीत; पण नियमित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, ते राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आले आहे.

- माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर