शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर बोर्डाचे दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष मंगेश व्यवहारे नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम ...

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष

मंगेश व्यवहारे

नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम शाळांनीच केले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी मूल्यांकन केले आहे. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच मूल्यांकनाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, मंडळाने निकालाच्या प्रक्रियेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडे डाटा पाठविला आहे.

शाळांना मूल्यांकनासाठी ११ ते ३० जून हा कालावधी देण्यात आला होता. मूल्यांकन करताना शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य, आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या होत्या. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यायचे होते. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरायचे होते. नियमित विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी काही शाळांना मूल्यांकन करताना काही त्रुटी भेडसावल्या; पण बोर्डाकडून केलेल्या मार्गदर्शनामुळे त्या त्रुटी दूर करण्यात आल्या. पुनर्परीक्षार्थ्यांच्या मूल्यांकनात आलेल्या त्रुटी बोर्ड अजूनही सोडवीत आहे. त्यामुळे निकाल घोषित करण्यास वेळ लागतो आहे. परिणामी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

- नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे परीक्षार्थी

एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२

पुनर्परीक्षार्थी - ५८९८

- ६९० पुनर्परीक्षार्थ्यांच्या त्रुटी काढण्याचे काम सुरू

दहावीच्या परीक्षेत ५८९८ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी होते. यातील १३८२ विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात बोर्डाला त्रुटी आढळल्या. शाळेने या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना स्कूल रेकॉर्डनुसार मूल्यांकन केले नव्हते. यातील ६९२ विद्यार्थ्यांच्या त्रुटी बोर्डाने काढल्या आहेत. हा प्रकार सर्वच विभागीय मंडळांना भेडसावत आहे.

- शाळांनी केलेल्या मूल्यांकनात गणित आणि विज्ञान विषयाचे गुणदान करताना झालेल्या दुर्लक्षामुळे काही अडचणी आल्या. बहुतांश शाळांनी योग्यच गुणदान केले. पण पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत गुणदान करताना भरपूर त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्रुटी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही शाळा त्रुटी पूर्ण करू शकल्या नाहीत; पण नियमित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, ते राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आले आहे.

- माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर