शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर बोर्डाचे दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष मंगेश व्यवहारे नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम ...

पुनर्परीक्षार्थ्यांमुळे आल्या त्रुटी : विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष

मंगेश व्यवहारे

नागपूर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम शाळांनीच केले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळांनी मूल्यांकन केले आहे. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच मूल्यांकनाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, मंडळाने निकालाच्या प्रक्रियेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडे डाटा पाठविला आहे.

शाळांना मूल्यांकनासाठी ११ ते ३० जून हा कालावधी देण्यात आला होता. मूल्यांकन करताना शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य, आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या होत्या. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यायचे होते. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाईन भरायचे होते. नियमित विद्यार्थ्यांची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी काही शाळांना मूल्यांकन करताना काही त्रुटी भेडसावल्या; पण बोर्डाकडून केलेल्या मार्गदर्शनामुळे त्या त्रुटी दूर करण्यात आल्या. पुनर्परीक्षार्थ्यांच्या मूल्यांकनात आलेल्या त्रुटी बोर्ड अजूनही सोडवीत आहे. त्यामुळे निकाल घोषित करण्यास वेळ लागतो आहे. परिणामी विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

- नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे परीक्षार्थी

एकूण परीक्षार्थी - १,५६,५६२

पुनर्परीक्षार्थी - ५८९८

- ६९० पुनर्परीक्षार्थ्यांच्या त्रुटी काढण्याचे काम सुरू

दहावीच्या परीक्षेत ५८९८ विद्यार्थी हे पुनर्परीक्षार्थी होते. यातील १३८२ विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात बोर्डाला त्रुटी आढळल्या. शाळेने या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना स्कूल रेकॉर्डनुसार मूल्यांकन केले नव्हते. यातील ६९२ विद्यार्थ्यांच्या त्रुटी बोर्डाने काढल्या आहेत. हा प्रकार सर्वच विभागीय मंडळांना भेडसावत आहे.

- शाळांनी केलेल्या मूल्यांकनात गणित आणि विज्ञान विषयाचे गुणदान करताना झालेल्या दुर्लक्षामुळे काही अडचणी आल्या. बहुतांश शाळांनी योग्यच गुणदान केले. पण पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत गुणदान करताना भरपूर त्रुटी आढळल्या. त्या दूर करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्रुटी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही शाळा त्रुटी पूर्ण करू शकल्या नाहीत; पण नियमित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, ते राज्य शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आले आहे.

- माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर