शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

९०० खाटांचे जम्बो हॉस्पिटल, २५ ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

ठळक वैशिष्ट्ये मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकरच साकार होणार २५ ऑक्सिजन प्लांट उभारणार दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन ...

ठळक वैशिष्ट्ये

मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो हॉस्पिटल लवकरच साकार होणार

२५ ऑक्सिजन प्लांट उभारणार

दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारणार

५ हजार जंबो सिलिंडर उपलब्ध होणार

दररोज १० हजार चाचण्या

१ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विकत घेणार

प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सक्षम करणार

आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी, हज हाउसचे श्रेणीवर्धन

कोराडी, कामठी, रामटेक, मौदा, उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणीवर्धन

लहान मुलांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश

स्थानिक डॉक्टरांना होम क्वारंटाइन रुग्णाची शुश्रूषा करण्याचे निर्देश

ट्रीटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकाऱ्यांची टीम गावांच्या भेटीवर

जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे पोलिसांना आदेश

रेमडेसिविर व औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई

बोगस आरटीपीसीआर अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ओसरलेली लाट पुन्हा उग्र झाली आहे. तज्ज्ञांच्या मते पुन्हा नागपूर शहर व ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी मानकापूर क्रीडा संकुल येथे ९०० खाटांचे जम्बो रुग्णालय आणि २५ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेपासून वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांना मास्टर प्लान तयार करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावेत, कोरोना रुग्णांसाठी ५ हजार जंबो सिलिंडर उपलब्ध करावेत, १ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर विकत घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजनपुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करा आणि दररोज दहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

प्रत्येक तालुक्यातील कोविड केअर सेंटर सक्षम केले जाईल. मेडिकल, मेयो एम्स व शहरातील अन्य खाजगी हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी याकडे लक्ष वेधा. इंदोरा भागातील आंबेडकर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल, हज हाउसचे श्रेणीवर्धन करण्यासाठी, तसेच

ग्रामीणमधील कोराडी, कामठी, रामटेक, मौदा, उमरेड, काटोल हॉस्पिटलचे श्रेणीवर्धन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. शहर व ग्रामीण भागात स्थानिक डॉक्टरांना होम क्वारंटाइनची शुश्रूषा करण्याचे निर्देश लवकरच राज्य शासन देणार आहे. त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाईल. रेमडेसिविर अन्य काही औषधांचा अतिरेकी वापर केल्यामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळे ट्रीटमेंट प्रोटोकॉल न पाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकाऱ्यांची टीम गावांच्या भेटीवर जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तथापि, त्या गावातील आरोग्यसुविधा व पायाभूत सुविधांकडेदेखील लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी केली.

रेमडेसिविर व औषधांचा काळाबाजार, आरटीपीसीआर अहवाल बोगस देणाऱ्या प्रयोगशाळामालकांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

रिकामटेकड्यांना १४ दिवस सोडू नका

जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी

पोलिसांनी अँटिजन केलेल्या रिकामटेकड्यांना १४ दिवस सोडू नका, असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांना केले, तसेच येत्या काळात शहरातील प्रमुख बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलीस सक्त कारवाई करतील, असे स्पष्ट केले.

रमजानमध्ये घरीच राहा

यावेळी पालकमंत्र्यांनी मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी रमजानच्या काळात घरातच सण साजरा करावा, असे आवाहन केले. रमजानच्या काळात रात्री विनाकारण गर्दी वाढणार नाही व त्यातून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुस्लीमबांधवांनी साथ रोग लक्षात घेता याबाबत मी जबाबदार मोहीम राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.