शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

विजेची ८७ उपकरणे, २५० बल्ब निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बाजारगाव : विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे बाजारगाव येथील ५२ नागरिकांच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बाजारगाव : विजेच्या तारांचे एकमेकांना घर्षण झाले आणि त्यातून निर्माण झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे बाजारगाव येथील ५२ नागरिकांच्या घरातील विजेची ८७ विविध उपकरणे व २५० बल्ब निकामी झाले असून, तिघांच्या घरातील इलेक्ट्रिक लाईन पूर्णपणे जळाली. यात एकूण ६ लाख १० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची नैतिक जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोल्हे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी रविवारी (दि. ८) सकाळी एमएच-४०/वाय-१९३२ क्रमांकाच्या टिप्परने रेती मागवली. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता अरुंद असला तरी त्यात रस्त्यावरून टिप्पर घराजवळ नेण्यात आला. रस्त्यावर विजेच्या तारा लाेंबकळलेल्या असल्याने त्यांचा टिप्परला स्पर्श हाेऊ नये म्हणून सुरेश काेल्हे यांचा मुलगा रितिक याने त्या तारा काठीने वर करण्याचा प्रयत्न केला.

या तारांचा एकमेकांना स्पर्श हाेताच शाॅर्टसर्किट झाले आणि क्षणात ५२ नागरिकांच्या घरांमधील विजेची उपकरणे निकामी झाली. या प्रकारामुळे ५२ जणांचे एकूण ६ लाख १० हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ता अरुंद असल्याने टिप्पर आज जाणार नाही, अशी आपण सूचना केली हाेती. मात्र, घरमालकाने जबरदस्तीने टिप्पर आत आणायला लावला. घरमालकाच्या मुलाने बांबूने तारा वर करण्याचा प्रयत्न केला व तारांचे घर्षण झाले. त्यामुळे भडका उडून ठिणग्या पडल्या, अशी माहिती टिप्परचालक राजेंद्र चौधरी, रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर याने दिली.

..

ही उपकरणे निकामी

या प्रकारामुळे ३५ टीव्ही, सहा रेफ्रिजेरेटर (फ्रिज), एक पाण्याचा माेटरपंप, एक एसी, १९ सिलिंग फॅन, तीन होम थिएटर, एक मोठा फ्रिजर, नऊ सेट टाॅप बाॅक्स, एक वॉटर फिल्टर, एक रेडिओ, एक मिक्सर आदी उपकरणे निकामी झाले असून, घरामधील २५० बल्ब फ्यूज झाले आहेत. शिवाय, तीन घरांमधील इलेक्ट्रिक फिटिंग पूर्णपणे जळाली.

...

जबाबदारी स्वीकारणार काेण

सुरेश कोल्हे यांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला. महावितरण कंपनीने कार्यालय बाजारगाव येथेच आहे. त्यांनी याबाबत आधी सूचना दिली असती तर कर्मचारी पाठवून याेग्य उपाययाेजना करीत हा प्रकार टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया महावितरण कंपनीचे उपअभियंता श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, जाेरात हवा वाहात असल्याने तारा वर उचलताच त्यांचे घर्षण झाले. तारा लाेंबकळल्या असल्याने त्या वर कराव्या लागल्याचे सुरेश काेल्हे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या नुकसानीची जबाबदारी स्वीकारायला कुणीही तयार नाही.