शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

८६ कोटींचा घोटाळा, पिता-पुत्रासह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई जगदीश जोशी लोकमत इम्पॅक्ट नागपूर : ८६ कोटींच्या ...

- जय श्रीराम को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : एफआयआरच्या दीड वर्षांनंतर कारवाई

जगदीश जोशी

लोकमत इम्पॅक्ट

नागपूर : ८६ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे आणि त्यांचा मुलगा अभिषेकसह सहा आरोपींना अटक केली आहे. लोकमतने एका महिन्यापूर्वी प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आरोपींमध्ये खेमचंद मेहरकुरे, त्यांचा मुलगा अभिषेक मेहरकुरे, योगेश चरडे, कुश कावरे, अशोक दुरगुडे आणि अर्चना टेके यांचा समावेश आहे.

लोकमतने २३ नोव्हेंबरला या प्रकरणात पोलीस कुचराई करीत असून आरोपींना अटक करीत नसल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चौकशी केली. सोसायटीचे जगनाडे चौक, गणेशनगर येथे कार्यालय असून शिवनगर निवासी खेमचंद मेहरकुरे अध्यक्ष आहेत. घोटाळा २०१८ मध्ये उजेडात आला होता. सोसायटी डेली कलेक्शन, एफडी, आरडी आदींच्या माध्यमातून गुंतवणूक स्वीकारत होती. याकरिता एजंट नियुक्त केले होते. दोन वर्षांपूर्वी सोसायटी अचानक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागली. गुंतवणूकदारांनी याची तक्रार कोतवाली ठाण्यात केली होती. पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर गुंतवणूकदारांनी ठाण्यासमोर निदर्शने केली होते. एप्रिल २०१९ मध्ये मेहरकुरेने पोलिसांसमोर पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही पैसे परत केले नाही. याची तक्रार पीडितांनी न्यायालयात केली. न्यायालयाच्या आदेशानंतर १३ जुलै २०१९ ला ४ कोटीचा आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक पीडित तक्रार करण्यासाठी पुढे आले. त्यानंतर हे प्रकरण १ सप्टेंबर २०१९ ला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी चौकशी करून ६.५० कोटींचा घोटाळा उजेडात आणला. सोसायटीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ७९.५४ कोटींचा घोटाळा झाल्याची बाब पुढे आली. पोलिसांचा तपास आणि ऑडिट रिपोर्टमध्ये आरोपींनी ८६ कोटींचा घोटाळा केल्याचे उजेडात आले. मीना जगताप यांनी आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी नेते आणि अनेक प्रभावशाली लोक जुळले आहेत. आरोपींनी घोटाळ्याची रक्कम सुरक्षित लोकांच्या हातात सोपविल्याचा गुंतवणूकदारांना संशय आहे. गुंतवणूकदारांनी आरोपींशी जुळलेल्या लोकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘आयाराम-गयाराम’ झाली आर्थिक शाखा

आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक निवृत्त कर्मचारी कंगाल झाले आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीची रक्कम सोसायटीत जमा केली होती. यातून त्यांनी मुलामुलींचे लग्न, शिक्षक आणि घराचे स्वप्न पाहिले होते. गेल्या एक वर्षात आर्थिक शाखेच्या पाच अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. पण ही शाखा आयाराम-गयाराम ठरली. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकऱ्यांना फटकारले. त्यानंतर डीसीपी विवेक मसाळ यांच्या नेतृत्त्वात निरीक्षक मीना जगताप यांच्याकडे चौकशी सोपविली. काही अधिकऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हे शाखा पांढरा हत्ती ठरली आहे.