शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

जिल्ह्यात २० वर्षांत ८५० आत्महत्या, ५२३ प्रकरणात मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या वर्षांनंतरही आत्महत्येची धग थांबलेली नाही. नागपूर जिल्ह्यात मागील २० वर्षांत म्हणजे २००१ पासून तर आतापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील फक्त ३०८ प्रकरणेच मदतपात्र ठरली असून, ५२३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात मागील वर्षात २०२० मध्ये शेतकरी आत्महत्येची ५१ प्रकरणे घडली. त्यातील २९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात येऊन, फक्त ८ प्रकरणे मदतपात्र ठरविण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे. यातील १४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. याच २०२१ या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तीन घटना जानेवारी महिन्यात तर दोन घटना फेब्रुवारी महिन्यात घडल्या. ही पाचही प्रकरणे जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी प्रलंबित ठेवली आहेत.

...

जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७

मदतीसाठी पात्र : २८

जिल्ह्यात २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ५१

मदतीसाठी पात्र : ८

...

त्र्यंबक पांडुरंग तागडे (अंबोला, त. नरखेड) यांनी ३ जून २०२० ला आत्महत्या केली होती. शेतीच्या बळावर दोन मुलींचे लग्न केले. दोन मुलांपैकी अमोल हा मानसिक रुग्ण व दिव्यांग आहे. लहान सागर याने गरिबीमुळे शिक्षण सोडून मजुरीचे काम धरले. पत्नी नंदा ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण आहे. कर्ता पुरुष गेला, आता जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

...

रामटेक तालुक्यातील महादुला येथे २०२० मध्ये अश्विन माराेतराव काठाेके (४२) यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आफ इंडिया बँकेचे ७० हजार, महिला बचत गटाचे ३० हजार तसेच व्याजाने व हातउसने घेतलेले असे दाेन लाख रुपयांचे कर्ज हाेते. शासनाकडे सर्व कागदपत्रे सादर करूनही मदत मिळाली नाही. घरी तीन एकर शेती आहे. माेलमजुरी करून पत्नी रेखा या दोन मुलांना कसेबसे जगवीत आहेत.

...

काटोल येथील मनोहर दाजीबा रेवतकर (४५) यांनी १५ ऑगस्ट २०१९ ला आत्महत्या केली. त्यांच्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. आत्महत्येला दीड वर्ष लोटूनही मदत मिळालेली नाही. एक मुलगी आणि मुलगा असा दोघांचा शिक्षणाचा खर्च सांभाळण्यासाठी त्यांची पत्नी कविता यांना आता खासगी कामाला जावे लागत आहे.

...

तालुक्यातील चिखली येथील शेतकरी राजेंद्र डोमाजी पिंपळकर या तरुण शेतकऱ्याने ११ जानेवारी २०१९ रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. जान्हवी व साक्षी या मुलींचे पालकत्व हरपले. राजेंद्रकडे केवळ चार एकर शेती होती. विधवा झालेली पत्नी कविता मुलींच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट उपसते. दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कविता पुढे आहे.

...

वृत्त संकलन : राहुल पेठकर (रामटेक), शिरीष खोबे (नरखेड), अमोल काळे (काटोल), शरद मिरे (भिवापूर)