शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

जिल्ह्यात २० वर्षांत ८५० आत्महत्या, ५२३ प्रकरणात मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या वर्षांनंतरही आत्महत्येची धग थांबलेली नाही. नागपूर जिल्ह्यात मागील २० वर्षांत म्हणजे २००१ पासून तर आतापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील फक्त ३०८ प्रकरणेच मदतपात्र ठरली असून, ५२३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात मागील वर्षात २०२० मध्ये शेतकरी आत्महत्येची ५१ प्रकरणे घडली. त्यातील २९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात येऊन, फक्त ८ प्रकरणे मदतपात्र ठरविण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे. यातील १४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. याच २०२१ या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तीन घटना जानेवारी महिन्यात तर दोन घटना फेब्रुवारी महिन्यात घडल्या. ही पाचही प्रकरणे जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी प्रलंबित ठेवली आहेत.

...

जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७

मदतीसाठी पात्र : २८

जिल्ह्यात २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ५१

मदतीसाठी पात्र : ८

...

त्र्यंबक पांडुरंग तागडे (अंबोला, त. नरखेड) यांनी ३ जून २०२० ला आत्महत्या केली होती. शेतीच्या बळावर दोन मुलींचे लग्न केले. दोन मुलांपैकी अमोल हा मानसिक रुग्ण व दिव्यांग आहे. लहान सागर याने गरिबीमुळे शिक्षण सोडून मजुरीचे काम धरले. पत्नी नंदा ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण आहे. कर्ता पुरुष गेला, आता जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

...

रामटेक तालुक्यातील महादुला येथे २०२० मध्ये अश्विन माराेतराव काठाेके (४२) यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आफ इंडिया बँकेचे ७० हजार, महिला बचत गटाचे ३० हजार तसेच व्याजाने व हातउसने घेतलेले असे दाेन लाख रुपयांचे कर्ज हाेते. शासनाकडे सर्व कागदपत्रे सादर करूनही मदत मिळाली नाही. घरी तीन एकर शेती आहे. माेलमजुरी करून पत्नी रेखा या दोन मुलांना कसेबसे जगवीत आहेत.

...

काटोल येथील मनोहर दाजीबा रेवतकर (४५) यांनी १५ ऑगस्ट २०१९ ला आत्महत्या केली. त्यांच्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. आत्महत्येला दीड वर्ष लोटूनही मदत मिळालेली नाही. एक मुलगी आणि मुलगा असा दोघांचा शिक्षणाचा खर्च सांभाळण्यासाठी त्यांची पत्नी कविता यांना आता खासगी कामाला जावे लागत आहे.

...

तालुक्यातील चिखली येथील शेतकरी राजेंद्र डोमाजी पिंपळकर या तरुण शेतकऱ्याने ११ जानेवारी २०१९ रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. जान्हवी व साक्षी या मुलींचे पालकत्व हरपले. राजेंद्रकडे केवळ चार एकर शेती होती. विधवा झालेली पत्नी कविता मुलींच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट उपसते. दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कविता पुढे आहे.

...

वृत्त संकलन : राहुल पेठकर (रामटेक), शिरीष खोबे (नरखेड), अमोल काळे (काटोल), शरद मिरे (भिवापूर)