शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

तीन जलाशयांमध्ये ७७० दलघमी जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : ताेतलाडाेह, पेंच व खिंडसी ही तिन्ही जलाशये एकमेकांना जाेडली असून, यातील पेंच ...

नत्थू घरजाळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : ताेतलाडाेह, पेंच व खिंडसी ही तिन्ही जलाशये एकमेकांना जाेडली असून, यातील पेंच जलाशयातील पाणी रामटेक व माैदा तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना सिंचनासाठी दिले जाते. वेळेवर पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसाेय व्हायची. मात्र, यावर्षी तिन्ही जलाशयांमध्ये सध्या एकूण ७७० दलघमी जलसाठा असल्याने धानाच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पेंच पाटबंधारे विभाग नागपूरअंतर्गत नागपूर व भंडारा जिल्ह्यातील एकूण १ लाख २० हजार हेक्टरमधील पिकांना सिंचनासाठी पाणी दिले जाते. यात ७० हजार हेक्टर खरीप व ५० हजार हेक्टरमधील रबी पिकांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा हा मुख्यत: पेंच नदीवरील ताेतलाडाेह जलाशयातून हाेताे. या नदीच्या उगमाकडे मध्य प्रदेशात चाैराई धरण असून, खालच्या भागाला पारशिवनी तालुक्यात पेंच जलाशय आहे. पेंचमधील पाणी सिंचनासाठी वापरले जात असून, त्यासाठी कालव्यांची निर्मिती केली आहे. शिवाय, रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशयात याचे जलाशयातील पाणी साेडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

सध्या पावसाळ्यापूर्वी तोतलाडोह जलाशयात ६२५ दलघमी (६१.५१ टक्के), पेंच जलाशयात १२० दलघमी (८४.९१ टक्के) आणि खिंडसी जलाशयात २५ दलघमी (२५.५० टक्के) असा एकूण ७७० दलघमी पाणीसाठा आहे. पेंचचे लाभक्षेत्र डाव्या व उजव्या या दाेन कालव्यांनी जाेडले आहे. पारशिवनी, रामटेक, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व इतर तालुक्यांना जाेडणाऱ्या डाव्या मुख्य कालव्याची लांबी ३३ किमी तर पारशिवनी, कामठी, माैदा व सावनेर तालुक्यांना जाेडणाऱ्या उजव्या कालव्याची लांबी ४८ किमी आहे.

तोतलाडोह जलाशयाची पाणी साठवण क्षमता १,०१६ दलघमी आहे. चाैराई धरणामुळे या जलाशयातील पाण्याची आवक ४२१ दलघमीने घटली आहे. पाण्याची ही कमतरता दूर करण्यासाठी मध्य प्रदेशातील कन्हान नदीवर जामघाट-लाेहघाेगरी येथून ६५ किमी टनलद्वारे पाणी आणण्याची याेजनाही राज्य शासनाने २०१८ मध्ये आखली हाेती. या प्रकल्पामुळे ३०० दलघमी पाणी मिळणार आहे. या पाण्याचा वापर सिंचनासाेबतच १६० मेगावॅट वीजनिर्मितीसाठी हाेणार आहे.

...

लाेहघाेगरी प्रकल्प महत्त्वाचा

ताेतलाडाेह जलाशयातील पाणीसाठा स्थिर ठेवण्यासाठी लाेहघाेगरी प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी ५० हेक्टर वनजमिनीची आवश्यकता आहे. राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम थाेडे मंदावले आहे. ताेतलाडाेह व पेंच जलाशय सिंचनासाेबत नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची तसेच खापरखेडा व काेराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पांना लागणाऱ्या पाण्याची गरज भागवते. त्यामुळे हा प्रकल्प शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

...

चाैराईच्या ओव्हरफ्लाेचा फायदा

सन २०१८ मध्ये १५ ऑगस्टपर्यंत रामटेक व पारशिवनी परिसरात पाऊस काेसळला नव्हता. शिवाय, चाैराई धरणातील पाणीही साेडण्यात आले नव्हते. त्यामुळे ताेतलाडाेह व पेंच जलाशयातील पाणीसाठा खूप खालावला हाेता. सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने धानाचे लागवड क्षेत्र अर्ध्यावर आले हाेते. नागपूर शहराला पिण्यासाठी पेंचच्या मृत जलसाठ्यातील १०० दलघमी पाणी देण्यात आले हाेते. त्यानंतर सलग दाेन वर्षे चाैराई धरण ओव्हरफ्लाे झाल्यााने पाण्याची कमतरता जाणवली नाही.

.....

या तिन्ही जलाशयांमध्ये यावर्षी पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील धानाच्या पिकाच्या सिंचनासाठी पाणी मिळण्याची १०० टक्के शाश्वती आहे. धानाच्या राेवणीच्यावेळी पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल. त्यामुळे राेवणीची कामे रेंगाळणार नाही. शिवाय, मजुरांनाही काम मिळेल.

- राजू भाेमले, उपविभागीय अभियंता,

पेंच पाटबंधारे उपविभाग, रामटेक.

...