शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

जिल्ह्यात ७,६८,६१४ कुटुंबीयांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग ...

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग आणि कामे बंद राहणार असल्याने गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देणार आहे. या निर्णयाचा फायदा नागपूर जिल्ह्यातील ७६८६१४ शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले होते. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले होते. आता परत राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात गरिबांची आबाळ होऊ नये म्हणून सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातच शिधापत्रिका धारकांना सुद्धा ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेशन दुकानातून एप्रिल महिन्याच्या धान्याचे वाटप सुरू आहे. मे महिन्याचा धान्यसाठा सुद्धा लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या पोटापाण्याची १५ दिवसांची सोय सरकारने केली आहे.

नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून १३०० स्वस्त धान्य दुकानदार आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना रेशन मिळते. केशरी कार्डधारकांना नियमित रेशनचा लाभ मिळत नाही. परंतु गेल्या लॉकडाऊनमध्ये केशरी कार्डधारकांनाही ५ किलो मोफत धान्य सरकारने दिले होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात केशरी कार्डबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.

- शिधापत्रिकाधारक

ग्रामीण

अंत्योदय - ७७०७८

प्राधान्य - ३१५०८२

शहर

अंत्योदय - ४४६८८

प्राधान्य - ३३१७६६

- मोफत मिळणारे धान्य

३ किलो गहू व २ किलो तांदूळ

- मागच्यावर्षी सरकारने लॉकडाऊननंतर खरोखरच आम्हाला रेशनचा आधार दिला. आता पुन्हा सरकारने लॉकडाऊनच्या काळात नियमित धान्याबरोबर ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेऊन शिधापत्रिका धारकांना दिलासा दिला आहे.

- अलका रामटेके, शिधापत्रिकाधारक

- रेशनच्या दुकानातून नियमित मिळणारे धान्य पुरे होते. या मोफत धान्याऐवजी खाद्यतेल दिले असते, तर गरिबांना त्याचा जास्त फायदा झाला असता. आज खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.

- तेजराम जनबंधू, शिधापत्रिकाधारक

- रेशन वितरण करण्याची आमची जबाबदारीच आहे. पण सरकारने आमच्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. आमची सरकारला मागणी आहे की, धान्याचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी आणि रेशनकार्ड धारकांना विमा सुरक्षा प्रदान करावी.

- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, राशन दुकानदार संघ