शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७,६८,६१४ कुटुंबीयांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग ...

नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग आणि कामे बंद राहणार असल्याने गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देणार आहे. या निर्णयाचा फायदा नागपूर जिल्ह्यातील ७६८६१४ शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

राज्यात मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले होते. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले होते. आता परत राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात गरिबांची आबाळ होऊ नये म्हणून सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातच शिधापत्रिका धारकांना सुद्धा ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेशन दुकानातून एप्रिल महिन्याच्या धान्याचे वाटप सुरू आहे. मे महिन्याचा धान्यसाठा सुद्धा लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या पोटापाण्याची १५ दिवसांची सोय सरकारने केली आहे.

नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून १३०० स्वस्त धान्य दुकानदार आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना रेशन मिळते. केशरी कार्डधारकांना नियमित रेशनचा लाभ मिळत नाही. परंतु गेल्या लॉकडाऊनमध्ये केशरी कार्डधारकांनाही ५ किलो मोफत धान्य सरकारने दिले होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात केशरी कार्डबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.

- शिधापत्रिकाधारक

ग्रामीण

अंत्योदय - ७७०७८

प्राधान्य - ३१५०८२

शहर

अंत्योदय - ४४६८८

प्राधान्य - ३३१७६६

- मोफत मिळणारे धान्य

३ किलो गहू व २ किलो तांदूळ

- मागच्यावर्षी सरकारने लॉकडाऊननंतर खरोखरच आम्हाला रेशनचा आधार दिला. आता पुन्हा सरकारने लॉकडाऊनच्या काळात नियमित धान्याबरोबर ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेऊन शिधापत्रिका धारकांना दिलासा दिला आहे.

- अलका रामटेके, शिधापत्रिकाधारक

- रेशनच्या दुकानातून नियमित मिळणारे धान्य पुरे होते. या मोफत धान्याऐवजी खाद्यतेल दिले असते, तर गरिबांना त्याचा जास्त फायदा झाला असता. आज खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.

- तेजराम जनबंधू, शिधापत्रिकाधारक

- रेशन वितरण करण्याची आमची जबाबदारीच आहे. पण सरकारने आमच्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. आमची सरकारला मागणी आहे की, धान्याचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी आणि रेशनकार्ड धारकांना विमा सुरक्षा प्रदान करावी.

- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, राशन दुकानदार संघ