शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

राज्यातील ७.५१ लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सेंद्रिय क्षेत्र घोषित होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

नागपूर : राज्यात सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्यासाठी मागील २० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. अनेक योजना राबविण्यात आल्या. असे ...

नागपूर : राज्यात सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्यासाठी मागील २० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. अनेक योजना राबविण्यात आल्या. असे असले तरी परंपरागत रसायनांचा वापर न करणाऱ्या किंवा अत्यल्प वापर करणाऱ्या राज्यातील कृषी क्षेत्राकडे सरकारने अद्याप या दृष्टिकोनातून पाहिलेले नाही. परिणामत: शेतकऱ्यांची मानसिकता असूनही राज्यातील ७.५१ लाख कृषी क्षेत्राला सेंद्रिय क्षेत्र घोषित होण्याची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्रात कोकण, डोंगराळ व आदिवासी क्षेत्रातील शेतकरी तसेच विदर्भात गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुका, पुसद आदी क्षेत्रांमध्ये रासायनिक खतांचा वापर अत्यल्प आहे. असे ७.५१ लाख हेक्टर क्षेत्र असून, या ठिकाणी १०० टक्के सेंद्रिय क्षेत्र करण्यासाठी योजना अंमलात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यात १ कोटी ५२ लाखांवर शेतकरी असून, सेंद्रिय शेती सहभागिता हमी प्रणाली या पोर्टलवर ५१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे.

राज्यातील या क्षेत्राला सेंद्रिय क्षेत्र घोषित करून शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देता येऊ शकते. या भागातील शेतकऱ्यांनी रसायनाचा वापर न केल्याने जमिनीचा पोत टिकून आहे. अशा क्षेत्रामध्ये अद्यापही जैवविविधता टिकून असलेली दिसते. यावर आधारित मार्केंटिंग मॉडेल तयार करून रसायनमुक्त धान्याचा आंतराष्ट्रीय बाजारही सुरू करता येऊ शकतो. या मालाला किंमत अधिक राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडण्याचीही अपेक्षा यात आहे.

...

प्रचारासाठी अंमलबजावणी

केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील २० वर्षांत सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी बराच खर्च केला. केंद्र शासनाच्या पुरस्कृत कृषी आराखड्यात सेंद्रिय शेती विकास योजना (२००१-०२ ते २०१२-१३) राबवून ७,३७२.०१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती विकास योजनेवर (२०१३-१४) ६१७.८१ लाख रुपयांचा खर्च झाला. सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अभियानावर (२००५-०६ ते २००८-०९) २,८५२.३७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये सेंद्रिय शेती धोरण राबवून १५०.०५ लाख रुपयांचा खर्च झाला. राज्य पुरस्कृत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन २०१९-२० ते २०२२-२३ या काळासाठी राबविण्याचे ठरले असून, १०,०००.०० लाख रुपयांची तरतूद झाली आहे. केंद्रपुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना २०१५-१६ पासून पुढे राबविण्यात आली. यावर १०,४००.०० लाखांचा निधी खर्च झाला. मात्र २०१९-२० मध्ये केंद्राकडून निधी मिळाला नाही. २०१९-२० मध्ये १६८३.२६ लाख निधी वितरित करण्यात आला.

...

अशा आहेत अपेक्षा

- सेंद्रिय शेती यंत्रणा जिल्हा पातळीवर उभारण्यात यावी.

- सेंद्रिय शेतीमालासाठी वेगळी किमान आधारभूत किंमत निश्चित करावी.

- शेतकरी ते ग्राहक थेट सेंद्रिय शेतमाल खरेदी-विक्री प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.

- सेंद्रिय शेतीमाल गुणवत्ता खासगी प्रयोगशाळा तपासणी खर्च कमी करावा.

...