शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नागपुरात पारपत्र बनविण्यासाठी असलेल्या गर्दीमध्ये ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 23:35 IST

सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.

ठळक मुद्देपीएसकेमध्ये न्यून कर्मचारी संख्येत चालत आहे काम

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग तीन महिने ताळेबंदी नंतर पासपोर्ट कार्यालय आणि पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले आहे. परंतु, पासपोर्ट बनविण्यासाठी आॅनलाईन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांची संख्या ७५ टक्के ने घसरली आहे. सोमवारी केवळ १३५ अपॉइंटमेंट ची नोंदणी झाली. सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.कोविड-१९ प्रकोपाच्या काळात जिथे परदेशात फसलेले भारतीय परत येत आहेत, तेथे विदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पासपोर्ट बनविण्यासाठी लोक येत नसल्याचे प्रमुख कारण आहे. दीड वर्षापर्यंत अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी वेटिंगची स्थिती असायची. त्या काळात पासपोर्ट बनविण्याच्या कामाचे विकेंद्रीकरणही झाले नव्हते. नंतर वर्धा सोबतच पोस्टाच्या काही कार्यालयात पासपोर्ट बनविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे, नागपुरातील 'पीएसके' मध्ये आवेदकांची संख्या ३० टक्के पर्यंत घसरली होती. तरी सुद्धा सरासरी दररोज ७०० आवेदक अपॉईंटमेंट घेत होते.

या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पीएसके मध्ये पासपोर्ट बनविणाºयांची संख्या बºयापैकी होती. मात्र मार्च पासून ही संख्या रोडावण्यास सुरुवात झाली. याच महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात ताळेबंदी मुळे कामकाज बंद करण्यात आले होते. त्यांनतर मे महिन्याच्या अखेर अखेर पर्यंत कामकाज सुरू करण्यात आले होते. पीएसके मध्ये आता रोज १०० ते १५० आवेदक पासपोर्ट बनविण्यासाठी पोहोचत आहेत. यातही बहुतांश लोक केवळ एक दस्ताऐवज म्हणूनच पासपोर्ट बनवत आहेत. तसेही नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डानांवर सद्यस्थितीत बंदीच आहे.हज आणि उमराह नसल्याने नुकसानकोरोनाच्या दुष्प्रभावामुळे यंदा मुस्लिम समाज हज यात्रेला जाऊ शकणार नाही. विशेष म्हणजे हज करिता वर्षभरात तिन हजाराहून अधिक पासपोर्ट बनविले जातात. याशिवाय प्रत्येक महिन्याला उमराह करिता जाणारे सरासरी २०० लोक पासपोर्ट बनवित असतात. पासपोर्ट द्वारे मिळणा?्या राजस्वात या दोन्ही यात्रांचे सहकार्य असते. ताळेबंदी पूर्वी पीएसकेमधून दररोज १२ ते १५ लाख रुपयांचे राजस्व प्राप्त होत होते. आता मात्र हा आकडा दोन लाखापर्यंत घसरल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आधी प्रमाणे ६ दिवसाच्या आत कोणत्याही तारखेलाच अपॉईंटमेंट चे निर्बंध आता नाही. आता जुलै महिन्याच्या कोणत्याही तारखेला अपॉईंटमेंट घेता येऊ शकते. तरी देखील इच्छुकांची संख्या रोडावलेलीच आहे.आरोग्य सेतू नाही तर प्रवेश नाही!सादिकाबाद येथील बºयाच अवेदकांना अपॉईंटमेंट मिळाल्यानंतरही रिकाम्या हाताने परत फिरावे लागल्याचे सांगण्यात येते. आवेदकांकडे मास्क, सॅनिटायजर, हातमोजे असणे गरजेचे आहे. शिवाय मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे साधा मोबाईल असेल त्यांना अपॉईंटमेंट असतानाही प्रवेश दिला जात नाही. साध्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड होत नसल्याने अशा अवेदकांची पंचाईत होत आहे.

टॅग्स :passportपासपोर्ट