शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

ग्रा.पं.साठी ७५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:26 IST

जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे.

ठळक मुद्देउमेदवाराचे भाग्य इव्हीएममध्ये बंद : आज मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींचे मतदान सोमवारी पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी ७५ टक्के झाली आहे. मतदान प्रक्रियेत तुरळक अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचा दावा निवडणूक अधिकाºयांनी केला आहे. २३७ ग्रा.पं.च्या सरपंचासह सदस्यपदाच्या उमेदवारांचे भाग्य सोमवारी मशीनबंद झाले. मंगळवारी तालुकास्तरावर मतमोजणी होऊन त्यांच्या भाग्याचा फैसला होईल.नरखेड तालुक्यात २२, काटोल २७, कळमेश्वर २३, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७,भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचे आज ९०० मतदान केंद्रांवर मतदान झाले. थेट सरपंच पदासाठी ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह होता, त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर जाणवला. कामठी तालुक्यातील रनाळा ग्रा.पं.मध्ये बोगस मतदान झाल्याची माहिती आहे. सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथेही बोगस मतदान झाल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. मौदा तालुक्यातील माथनी, नरखेड तालुक्यातील मेंढला येथे इव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडून तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणीला तालुकास्तरावर सुरुवात होणार आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील २३७ गावांमध्ये दोन दिवसांपूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे.रात्री ८ पर्यंत चालले मतदानतारसामध्ये वॉर्ड क्र. ५ या मतदान केंद्रावर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. मतदान प्रक्रिया संपण्यापर्यंत मतदान केंद्राबाहेरही रांगा होत्या. त्यामुळे ५.३० पर्यंत जे मतदार रांगेत होते त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला रात्री ८ वाजले. तिथे मतदानाची टक्केवारी ८५.९१ टक्के नोंदविण्यात आली.दुपारी ३.३० पर्यंत ६३.५५ टक्के मतदानमतदानाला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद होता. पहिल्या तीन तासात जवळपास चार लाखाहून अधिक मतदान झाले होते. १.३० वाजेपर्यंत जवळपास ४५.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ६३.५५ टक्के मतदान झाले होते. यात सर्वाधिक मतदान हे काटोल तालुक्यात ७६.५ टक्के तर सर्वात कमी मतदान रामटेक तालुक्यात ५७.७९ टक्के झाले होते.