शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

लॉकडाऊनच्या ५० दिवसात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 00:21 IST

केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरिटेल व्यवसायात होणार मोठे बदल : १.५ लाख कोटीचे जीएसटीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यापाऱ्यांना वेबिनारद्वारे संबोधित करताना दिली.भरतीया म्हणाले, लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल दिसून येणार असून बाजारपेठांमध्ये केवळ २० टक्के ग्राहक येण्याची शक्यता आहे. अनेकांचा ऑनलाईनवर भर राहणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही सज्ज राहावे लागेल. कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये पुढेही राहणार असून ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणार नाहीत. या वित्तीय संकटामुळे लॉकडाऊन हटल्यानंतर देशातील किमान २० टक्के व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. अशा संकटसमयी रिटेल व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या नवीन तऱ्हा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. व्यापाऱ्यांना ग्राहककेंद्रित वातावरण तयार करावे लागेल, याशिवाय डिजिटल आणि संपर्करहित भुगतान आणि आयटीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच डिजिटल ई-कॉमर्ससह भौतिक दुकानाचे एकीकरण, नियम आणि कायद्याचे पालन केल्यास व्यापाऱ्यांना बदलत्या परिस्थितीत सक्षम होता येईल.भरतीया म्हणाले, कोविड-१९ ने भारतीय रिटेल व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायाचे भविष्य संकटात आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर व्यवसाय सुरू होण्यास किमान तीन महिने लागतील. डिसेंबर २०२० पर्यंत व्यवसाय सुरळीत होईल. सध्या देशातील रिटेल व्यापाºयांना नवरात्री ते दिवाळीत होणाऱ्या व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली असून दिवाळीत खर्च करतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यावर व्यापारी अवलंबून आहेत. भरतीया म्हणाले, आता बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारातही बदल होणार आहे. एकल अथवा खासगी व्यवसायाऐवजी आपसी सहयोगाचा अवलंब व्यापाऱ्यांना करावा लागणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यवहारात बदल घडवून आणावा लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय