शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या ५० दिवसात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 00:21 IST

केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देरिटेल व्यवसायात होणार मोठे बदल : १.५ लाख कोटीचे जीएसटीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने २४ मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर ५० दिवसात देशात रिटेल क्षेत्रात ७.५ लाख कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या १.५ लाख कोटी रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल होणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी व्यापाऱ्यांना वेबिनारद्वारे संबोधित करताना दिली.भरतीया म्हणाले, लॉकडाऊननंतर रिटेल व्यवसायात मोठे बदल दिसून येणार असून बाजारपेठांमध्ये केवळ २० टक्के ग्राहक येण्याची शक्यता आहे. अनेकांचा ऑनलाईनवर भर राहणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही सज्ज राहावे लागेल. कोरोनाची भीती ग्राहकांमध्ये पुढेही राहणार असून ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणार नाहीत. या वित्तीय संकटामुळे लॉकडाऊन हटल्यानंतर देशातील किमान २० टक्के व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे. अशा संकटसमयी रिटेल व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या नवीन तऱ्हा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. व्यापाऱ्यांना ग्राहककेंद्रित वातावरण तयार करावे लागेल, याशिवाय डिजिटल आणि संपर्करहित भुगतान आणि आयटीवर भर द्यावा लागणार आहे. तसेच डिजिटल ई-कॉमर्ससह भौतिक दुकानाचे एकीकरण, नियम आणि कायद्याचे पालन केल्यास व्यापाऱ्यांना बदलत्या परिस्थितीत सक्षम होता येईल.भरतीया म्हणाले, कोविड-१९ ने भारतीय रिटेल व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायाचे भविष्य संकटात आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर व्यवसाय सुरू होण्यास किमान तीन महिने लागतील. डिसेंबर २०२० पर्यंत व्यवसाय सुरळीत होईल. सध्या देशातील रिटेल व्यापाºयांना नवरात्री ते दिवाळीत होणाऱ्या व्यवसायात तेजी येण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या पैशाची मोठ्या प्रमाणात बचत झाली असून दिवाळीत खर्च करतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यावर व्यापारी अवलंबून आहेत. भरतीया म्हणाले, आता बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारातही बदल होणार आहे. एकल अथवा खासगी व्यवसायाऐवजी आपसी सहयोगाचा अवलंब व्यापाऱ्यांना करावा लागणार आहे. त्याकरिता व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यवहारात बदल घडवून आणावा लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय