शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

तालुक्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा ...

भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा खरीप हंगामाची सुरुवातच अनुकूल वातावरणाने झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. उघडझाप पावसात पेरलेले बियाणे अंकुरण्यास सुरुवातही झाली आहे.

तालुक्यात आठवडाभरापूर्वी सर्वप्रथम नक्षी शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी, कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरुवात केली. वातावरण अनुकूल असल्याने नक्षी पाठोपाठ मेढा, मांगली, तातोली, झिलबोडी, हत्तेबोडी, मालेवाडा, जवळी, वाकेश्वर, पाहमी, चिचाळा, कारगाव, सेलोटी, सोमनाळा, मांडवा, पुल्लर, अड्याळ, मोखाबर्डी, नागतरोली, चिखली, रोहना या भागातही पेरणीच्या कामाला वेग आला. नांद परिसरात तर ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या आहे. संपूर्ण तालुक्यात ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हेसुध्दा अंकुरल्याचे चिञ आहे. त्यामुळे निसर्गाची कृपा अशीच राहिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीतून काहीशी सुटका होणार आहे. अद्याप तरी पावसाअभावी किंवा जास्त पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसत नाही.

१५ जुलैपर्यंत पेरणी करा!

पेरणीसाठी घाई न करता, पावसाचा पूर्ण अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. पेरणी नंतर लागोपाठ मुसळधार पाऊस आल्यास शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचू शकते. त्यामुळे घाई करू नका! १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करता येणार आहे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

--

नक्षी येथील अनिकेत वराडे यांच्या शेतातील बियाणे अंकुरण्यास सुरुवात झाली आहे.