शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

तालुक्यात ७० टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा ...

भिवापूर : आधी पावसाची चिंता आणि नंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही याची धाकधूक शेतकऱ्यांना दरवर्षी असते. मात्र यंदा खरीप हंगामाची सुरुवातच अनुकूल वातावरणाने झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. उघडझाप पावसात पेरलेले बियाणे अंकुरण्यास सुरुवातही झाली आहे.

तालुक्यात आठवडाभरापूर्वी सर्वप्रथम नक्षी शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी, कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरुवात केली. वातावरण अनुकूल असल्याने नक्षी पाठोपाठ मेढा, मांगली, तातोली, झिलबोडी, हत्तेबोडी, मालेवाडा, जवळी, वाकेश्वर, पाहमी, चिचाळा, कारगाव, सेलोटी, सोमनाळा, मांडवा, पुल्लर, अड्याळ, मोखाबर्डी, नागतरोली, चिखली, रोहना या भागातही पेरणीच्या कामाला वेग आला. नांद परिसरात तर ८० ते ८५ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या आहे. संपूर्ण तालुक्यात ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. कपाशी लागवड आणि धानाचे पऱ्हेसुध्दा अंकुरल्याचे चिञ आहे. त्यामुळे निसर्गाची कृपा अशीच राहिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीतून काहीशी सुटका होणार आहे. अद्याप तरी पावसाअभावी किंवा जास्त पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसत नाही.

१५ जुलैपर्यंत पेरणी करा!

पेरणीसाठी घाई न करता, पावसाचा पूर्ण अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. पेरणी नंतर लागोपाठ मुसळधार पाऊस आल्यास शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचू शकते. त्यामुळे घाई करू नका! १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करता येणार आहे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

--

नक्षी येथील अनिकेत वराडे यांच्या शेतातील बियाणे अंकुरण्यास सुरुवात झाली आहे.