शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात धावल्या ७० बसेस; उत्पन्न मिळाले फक्त पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत २२ लाख रुपयांवर आले होते, ते या दोन दिवसात चांगलेच खालावले आहे.

नागपूर विभागामध्ये असलेल्या काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड या चार ग्रामीणमधील आगारांसह नागपूर शहरात चार असे एकूण आठ आगार आहेत. गणेशपेठ आगार सर्वात मोठे आहे. येथे नियमित १,१५० ते १,२०० फेऱ्या असतात. मात्र शनिवारी ३६५ व रविवारी २६७ फेऱ्या सोडण्यात आल्या. आगारात ८० बसेस असल्या तरी फक्त २५ बसेस या दोन दिवसात धावल्या. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नागपूर विभागात ४५० बसेस असल्या तरी ‘ब्रेक द चेन’ काळात २०० बसेस चालविल्या जात होत्या. या दोन दिवसात ६० ते ७० बसेस जिल्ह्यात धावल्या. नियमित फेऱ्या एक लाख ६० हजार किलोमीटर असायच्या. ब्रेक द चेन काळात ८० हजार किलोमीटर आणि या दोन दिवसात २० हजार किलोमीटरवर प्रवास आला.

...

नागपूर जिल्ह्यातील आठ आगारातील एकूण बसेस : ४५०

दोन दिवसात धावलेल्या बसेस : ६० ते ७०

सर्व आगारांमधील फेऱ्या : २४०

दोन दिवसात मिळालेले उत्पन्न : ४ ते ५ लाख

...

बॉक्स

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर

नागपूर विभागातील आठही आगार मिळून २,७५० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दोन हजारांच्या संख्येतील वाहक आणि चालकांची सेवा अत्यावश्यक श्रेणीत येते, तर अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात आली होती. बसेसच्या फेऱ्या घटल्याने या दोन दिवसात वाहक आणि चालकांनाही गरजेनुसार कामावर बोलावण्यात आले होते.

...

कोट

विभागात महामंडळाला दोन दिवसात मोठे नुकसान झाले. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारी पूर्ण क्षमतेने वाहतूक राहील. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

...

बॉक्स

दोन दिवसात १५ लाखांचा तोटा

- शनिवार आणि रविवार या दोन दिवसात नागपूर आगाराला १५ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. अलीकडच्या काळात २२ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज असायचे, ते या दोन दिवसात फक्त ४ ते ५ लाख रुपयांवर आले.

- या दोन दिवसात ८० टक्के प्रवासी सेवा बंद करावी लागली होती. लांब पल्ल्यांच्या बसेसही कमी कराव्या लागल्या. या फेऱ्यांना प्रवाशी अगदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या अनुभवानंतर रविवारी फेऱ्यांच्या संख्येत घट करण्यात आली.

...