शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

दोन दिवसात धावल्या ७० बसेस; उत्पन्न मिळाले फक्त पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे ...

नागपूर : जिल्ह्यातील आठही आगारामिळून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात एसटी महामंडळाला फक्त ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेत २२ लाख रुपयांवर आले होते, ते या दोन दिवसात चांगलेच खालावले आहे.

नागपूर विभागामध्ये असलेल्या काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड या चार ग्रामीणमधील आगारांसह नागपूर शहरात चार असे एकूण आठ आगार आहेत. गणेशपेठ आगार सर्वात मोठे आहे. येथे नियमित १,१५० ते १,२०० फेऱ्या असतात. मात्र शनिवारी ३६५ व रविवारी २६७ फेऱ्या सोडण्यात आल्या. आगारात ८० बसेस असल्या तरी फक्त २५ बसेस या दोन दिवसात धावल्या. यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याचे आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नागपूर विभागात ४५० बसेस असल्या तरी ‘ब्रेक द चेन’ काळात २०० बसेस चालविल्या जात होत्या. या दोन दिवसात ६० ते ७० बसेस जिल्ह्यात धावल्या. नियमित फेऱ्या एक लाख ६० हजार किलोमीटर असायच्या. ब्रेक द चेन काळात ८० हजार किलोमीटर आणि या दोन दिवसात २० हजार किलोमीटरवर प्रवास आला.

...

नागपूर जिल्ह्यातील आठ आगारातील एकूण बसेस : ४५०

दोन दिवसात धावलेल्या बसेस : ६० ते ७०

सर्व आगारांमधील फेऱ्या : २४०

दोन दिवसात मिळालेले उत्पन्न : ४ ते ५ लाख

...

बॉक्स

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर

नागपूर विभागातील आठही आगार मिळून २,७५० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दोन हजारांच्या संख्येतील वाहक आणि चालकांची सेवा अत्यावश्यक श्रेणीत येते, तर अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात आली होती. बसेसच्या फेऱ्या घटल्याने या दोन दिवसात वाहक आणि चालकांनाही गरजेनुसार कामावर बोलावण्यात आले होते.

...

कोट

विभागात महामंडळाला दोन दिवसात मोठे नुकसान झाले. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारी पूर्ण क्षमतेने वाहतूक राहील. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

...

बॉक्स

दोन दिवसात १५ लाखांचा तोटा

- शनिवार आणि रविवार या दोन दिवसात नागपूर आगाराला १५ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. अलीकडच्या काळात २२ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज असायचे, ते या दोन दिवसात फक्त ४ ते ५ लाख रुपयांवर आले.

- या दोन दिवसात ८० टक्के प्रवासी सेवा बंद करावी लागली होती. लांब पल्ल्यांच्या बसेसही कमी कराव्या लागल्या. या फेऱ्यांना प्रवाशी अगदी कमी असल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या अनुभवानंतर रविवारी फेऱ्यांच्या संख्येत घट करण्यात आली.

...