शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

६७ टक्के विद्यार्थ्यांना हवी आहे अकरावीसाठी सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

आशीष दुबे नागपूर : कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली होती. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत. ...

आशीष दुबे

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली होती. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी नाराज आहेत. ६७ टक्के विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटी (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) घेण्यावर सकारात्मक मत दर्शविले आहे. राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या एका संयुक्त सर्वेक्षणामध्ये हे चित्र पुढे आले आहे.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व्हे मागील महिन्यात करण्यात आला होता. यात विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांना सहभागी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना यात फक्त दोनच प्रश्नांवर मत विचारण्यात आले होते. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घ्यावी अथवा नाही, या प्रश्नावर ६७ टक्के विद्यार्थ्यांनी सकारात्मक मत दर्शविले. यासोबतच, दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरही नाराजी दर्शविली. सर्व्हेनंतरही शिक्षण विभागाने व राज्य शिक्षण बोर्डाने कोणताही स्पष्ट निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सर्व्हे झाल्याच्या वृत्ताला त्यांनी पुष्टी दिली. मात्र, सीईटी कधी होणार, यावर निर्णय झालेला नाही.

सीईटीवर निर्णय न झाल्याने अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही ठरलेले नाही. प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार हे आधी बोर्डाला ठरवावे, लागणार आहे. यानंतरच अंकसूचीचे प्रारूप व अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेची निश्चिती होईल. बोर्डाच्या अंक सूचीच्या आधारावरच अकरावीमधील प्रवेश होतील.

...

अभ्यासक्रम झाला होता पूर्ण

कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षी शाळा उघडल्या नसल्या तरी शाळांनी ऑनलाईन वर्ग भरविले होते. यामुळे परीक्षेच्या दृष्टीने आपली तयारी झाली होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षा रद्द करण्याऐवजी कोरोना संक्रमणापासून बचाव करीत परीक्षा कशी घेता येईल, असा दुसरा पर्याय राज्य सरकार व बोर्डाने शोधायला हवा होता.

...

शिक्षकांचे मत विचारात घेतलेच नाही

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना बोर्ड आणि राज्य सरकारने शिक्षकांचे मत विचारात घ्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. असे झाले असते, तर परीक्षा रद्द करण्याची वेळ आली नसती.

...