शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षांत ६१ टक्के अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. तब्बल ६१ टक्के अर्ज अपात्र ठरले असून, २१ वर्षांत ३१३ कुटुंबीयांना केवळ ३ कोटी १३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दोन दशके झाल्यानंतरदेखील मदतीच्या रकमेत वाढ झालेली नसून, जगाच्या पोशिंद्याच्या जीवाची रक्कम केवळ एक लाख रुपये इतकीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली होती. २००१ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नागपूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातील किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत मिळाली, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील २००१ सालापासून नागपूर जिल्ह्यात ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. परंतु शासकीय अटीनुसार यातील ३१३ म्हणजे केवळ ३६.१४ टक्के शेतकऱ्यांची कुटुंबेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये यानुसार तीन कोटी १३ लाख रुपयांची मदत देण्यात आली, तर ६१.६६ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली. १९ अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

२० महिन्यात मदतीचे ७२ अर्ज

दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तितके अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यापैकी १३ कुटुंबीयांना १३ लाखाची मदत मिळाली, तर ३९ प्रकरणे अपात्र ठरली. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२० मधील १० प्रकरणे चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित आहेत. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय लेटलतिफीमुळे आता मदतीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

मदतीची रक्कम कधी वाढणार?

२००१ सालापासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्ज पात्र ठरल्यास एक लाख रुपयाची शासकीय मदत देण्यात येते. २१ वर्षांत महागाई प्रचंड वाढली. शासकीय वेतनातदेखील वाढ झाली. परंतु शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत मात्र एक लाख रुपये इतकीच कायम आहे. ही रक्कम कधी वाढणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.