शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षांत ६१ टक्के अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. तब्बल ६१ टक्के अर्ज अपात्र ठरले असून, २१ वर्षांत ३१३ कुटुंबीयांना केवळ ३ कोटी १३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दोन दशके झाल्यानंतरदेखील मदतीच्या रकमेत वाढ झालेली नसून, जगाच्या पोशिंद्याच्या जीवाची रक्कम केवळ एक लाख रुपये इतकीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली होती. २००१ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नागपूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातील किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत मिळाली, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील २००१ सालापासून नागपूर जिल्ह्यात ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. परंतु शासकीय अटीनुसार यातील ३१३ म्हणजे केवळ ३६.१४ टक्के शेतकऱ्यांची कुटुंबेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये यानुसार तीन कोटी १३ लाख रुपयांची मदत देण्यात आली, तर ६१.६६ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली. १९ अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

२० महिन्यात मदतीचे ७२ अर्ज

दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तितके अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यापैकी १३ कुटुंबीयांना १३ लाखाची मदत मिळाली, तर ३९ प्रकरणे अपात्र ठरली. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२० मधील १० प्रकरणे चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित आहेत. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय लेटलतिफीमुळे आता मदतीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

मदतीची रक्कम कधी वाढणार?

२००१ सालापासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्ज पात्र ठरल्यास एक लाख रुपयाची शासकीय मदत देण्यात येते. २१ वर्षांत महागाई प्रचंड वाढली. शासकीय वेतनातदेखील वाढ झाली. परंतु शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत मात्र एक लाख रुपये इतकीच कायम आहे. ही रक्कम कधी वाढणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.