शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

२१ वर्षांत ६१ टक्के अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील २१ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील साडेआठशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असली तरी अर्ध्याही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. तब्बल ६१ टक्के अर्ज अपात्र ठरले असून, २१ वर्षांत ३१३ कुटुंबीयांना केवळ ३ कोटी १३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दोन दशके झाल्यानंतरदेखील मदतीच्या रकमेत वाढ झालेली नसून, जगाच्या पोशिंद्याच्या जीवाची रक्कम केवळ एक लाख रुपये इतकीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली होती. २००१ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत नागपूर जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यातील किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत मिळाली, ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील २००१ सालापासून नागपूर जिल्ह्यात ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. परंतु शासकीय अटीनुसार यातील ३१३ म्हणजे केवळ ३६.१४ टक्के शेतकऱ्यांची कुटुंबेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये यानुसार तीन कोटी १३ लाख रुपयांची मदत देण्यात आली, तर ६१.६६ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली. १९ अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

२० महिन्यात मदतीचे ७२ अर्ज

दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तितके अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यापैकी १३ कुटुंबीयांना १३ लाखाची मदत मिळाली, तर ३९ प्रकरणे अपात्र ठरली. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२० मधील १० प्रकरणे चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित आहेत. घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबीयांच्या वाट्याला प्रशासकीय लेटलतिफीमुळे आता मदतीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

मदतीची रक्कम कधी वाढणार?

२००१ सालापासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्ज पात्र ठरल्यास एक लाख रुपयाची शासकीय मदत देण्यात येते. २१ वर्षांत महागाई प्रचंड वाढली. शासकीय वेतनातदेखील वाढ झाली. परंतु शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत मात्र एक लाख रुपये इतकीच कायम आहे. ही रक्कम कधी वाढणार, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.