शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

विदर्भातील सहा हजार आजारी कंपन्यांना मिळाले ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:41 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजअंतर्गत विदर्भातील ३० टक्के अर्थात जवळपास ६ हजार आजारी कंपन्यांना बँकांकडून वित्त पुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे.

ठळक मुद्देआर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज वस्तूंच्या विक्रीसह शासनाचे कर संकलन वाढणार

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजअंतर्गत विदर्भातील ३० टक्के अर्थात जवळपास ६ हजार आजारी कंपन्यांना बँकांकडून वित्त पुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्यातील मरगळ दूर होऊन नवसंजीवनी मिळाली आहे. पॅकेजमुळे आजारी कंपन्या पुन्हा उभ्या होतील आणि रोजगार निर्मितीसह सरकारचे कर संकलन वाढणार आहे.फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ विदर्भाचे सचिव आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद कानडे म्हणाले, बँका पूर्वी आजारी उद्योगांना परतवून लावत होते. पण आता गॅरंटीविना बँकांकडून आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आजारी उद्योगांना नव्याने सुरू होण्यास मदत होणार आहे. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी घोषित ३ लाख कोटींच्या पॅकेजपैकी विदर्भाच्या वाट्याला किती येईल, हे सांगणे कठीण आहे. पण आजारी उद्योगांना आर्थिक गुणवत्तेच्या आधारावर वित्त पुरवठा होणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना पूर्वीची थकीत देणी पूर्ण करून नव्याने उद्योग सुरू करता येईल.पॅकेजमध्ये वीज वितरण कंपन्यांना ९० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा आणि चंद्रपूर येथील इंजिनिअरिंग कंपन्यांना वीज वितरण कंपन्यांकडील थकीत रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. या घोषणेने इंजिनिअरिंग कंपन्यांना यांत्रिक व तांत्रिक बळ मिळाले आहे. केंद्र सरकारने आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी तेवढीच महत्त्वाची आहे, असे मिलिंद कानडे म्हणाले.कंपन्यांना शेअर बाजार नोंदणीचा मार्ग सुकरपूर्वीच्या तुलनेत आता सूक्ष्म उद्योगाला १ कोटींची गुंतवणूक व ५ कोटींची उलाढाल, लघु उद्योगांना १० कोटींची गुंतवणूक व ५० कोटींची उलाढाल आणि मध्यम उद्योगांना २० कोटींची गुंतवणूक व १०० कोटींची उलाढाल या व्याख्येत टाकले आहे. त्यामुळे आता लघु उद्योगांनाही स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी करून भांडवलात वृद्धी आणि नव्याने भांडवल उभे करता येईल, शिवाय अशा कंपन्यांना बँकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. बदलत्या व्याख्येमुळे आजारी आणि योग्यरीत्या सुरू असलेल्या उद्योगांची निश्चितच भरभराट होणार आहे, असे कानडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :businessव्यवसाय