शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

विदर्भातील सहा हजार आजारी कंपन्यांना मिळाले ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:41 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजअंतर्गत विदर्भातील ३० टक्के अर्थात जवळपास ६ हजार आजारी कंपन्यांना बँकांकडून वित्त पुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे.

ठळक मुद्देआर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज वस्तूंच्या विक्रीसह शासनाचे कर संकलन वाढणार

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रातील मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजअंतर्गत विदर्भातील ३० टक्के अर्थात जवळपास ६ हजार आजारी कंपन्यांना बँकांकडून वित्त पुरवठ्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यांच्यातील मरगळ दूर होऊन नवसंजीवनी मिळाली आहे. पॅकेजमुळे आजारी कंपन्या पुन्हा उभ्या होतील आणि रोजगार निर्मितीसह सरकारचे कर संकलन वाढणार आहे.फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ विदर्भाचे सचिव आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद कानडे म्हणाले, बँका पूर्वी आजारी उद्योगांना परतवून लावत होते. पण आता गॅरंटीविना बँकांकडून आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आजारी उद्योगांना नव्याने सुरू होण्यास मदत होणार आहे. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी घोषित ३ लाख कोटींच्या पॅकेजपैकी विदर्भाच्या वाट्याला किती येईल, हे सांगणे कठीण आहे. पण आजारी उद्योगांना आर्थिक गुणवत्तेच्या आधारावर वित्त पुरवठा होणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना पूर्वीची थकीत देणी पूर्ण करून नव्याने उद्योग सुरू करता येईल.पॅकेजमध्ये वीज वितरण कंपन्यांना ९० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा आणि चंद्रपूर येथील इंजिनिअरिंग कंपन्यांना वीज वितरण कंपन्यांकडील थकीत रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. या घोषणेने इंजिनिअरिंग कंपन्यांना यांत्रिक व तांत्रिक बळ मिळाले आहे. केंद्र सरकारने आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी तेवढीच महत्त्वाची आहे, असे मिलिंद कानडे म्हणाले.कंपन्यांना शेअर बाजार नोंदणीचा मार्ग सुकरपूर्वीच्या तुलनेत आता सूक्ष्म उद्योगाला १ कोटींची गुंतवणूक व ५ कोटींची उलाढाल, लघु उद्योगांना १० कोटींची गुंतवणूक व ५० कोटींची उलाढाल आणि मध्यम उद्योगांना २० कोटींची गुंतवणूक व १०० कोटींची उलाढाल या व्याख्येत टाकले आहे. त्यामुळे आता लघु उद्योगांनाही स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी करून भांडवलात वृद्धी आणि नव्याने भांडवल उभे करता येईल, शिवाय अशा कंपन्यांना बँकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. बदलत्या व्याख्येमुळे आजारी आणि योग्यरीत्या सुरू असलेल्या उद्योगांची निश्चितच भरभराट होणार आहे, असे कानडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :businessव्यवसाय