शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

वर्षभरात ५२ हजार प्रवासी रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली. ...

नागपूर : लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीने असंख्य प्रवाशांनी प्रवास टाळला. प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्या रद्द करण्याची पाळी आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाने देशात शिरकाव करताच २४ मार्च २०२० पासून भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद केली. संपूर्ण एप्रिल महिन्यात एकही प्रवासी रेल्वेगाडी धावली नाही. परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडून देण्यासाठी मे महिन्यात श्रमिक स्पेशल एक्सप्रेस चालविण्यात आल्या. जून महिन्यापासून मोजक्या विशेष एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा रेल्वेगाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या वर्षभराच्या काळात नागपूर विभागातून धावणाऱ्या ३७ हजार ३६१ एक्सप्रेस व १५ हजार ४९१ पॅसेंजर अशा एकूण ५२ हजार ८५२ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर, याच काळात नागपूर विभागातून नऊ हजार ९८० एक्सप्रेस व दोन हजार ८०२ पॅसेंजर अशा एकूण १२ हजार ७८२ प्रवासी रेल्वेगाड्या धावल्या. त्यांतून १८ लाख ७२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यांच्याकडून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला १२२ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, वर्षभरात नऊ लाखांहून अधिक प्रवाशांनी रेल्वे तिकीट रद्द केले. त्यांच्याकडून तिकीट कॅन्सलेशन चार्जसपोटी रेल्वेला ७.८९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.