शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 11:10 IST

इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे.

ठळक मुद्देपिचकारी, टोपी, मुखवट्याला मागणी

नागपूर : तब्बल दोन वर्षांनंतर यंदा होळीचा गुलाल सर्वाधिक उधळला जाणार आहे. यंदा १७ मार्चला होलिका दहन आणि १८ मार्चला रंगपंचमी असल्यामुळे लोक होळीच्या रंगात रंगलेले दिसतील.

होळीला तीन दिवस उरले असून यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. इतवारी आणि रेशिम ओळीमध्ये पारंपरिक आणि हर्बल गुलाल, रंगासह पिचकारी, टोपी, मुखवटे आणि अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. यंदा नागपुरातून जवळपास ५०० टन गुलाल विक्रीची उत्पादकांना अपेक्षा आहे.

विविधरंगी गुलाल दीडपटीने महाग

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा युक्रेन युद्धामुळे विविधरंगी गुलाल आणि रंग महाग झाले आहेत. गुलाल तयार करण्यासाठी लागणारे आरारोट, रंग आणि ऑईल महागल्यामुळे यंदा गुलालाच्या किमती दीडपटीने वाढल्या आहेत. याशिवाय क्रूड ऑईलची किंमत वाढल्यामुळे प्लास्टिक दाणे महाग झाले आणि दाण्यांपासून तयार झालेल्या प्लास्टिकच्या पिचकारीसह अन्य वस्तूंच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच स्पायडर मॅन, पबजी, गन्स, अप्पू टँक, पाईप आणि फुगे बाजारात असून जास्त किमतीत खरेदी करावे लागत आहेत. बाजारात पारंपरिकऐवजी खेळणी आणि कार्टुनच्या पिचकाऱ्या व गनला मागणी आहे. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या ५० ते ८०० रुपयांपर्यंत, तर मुखवटे आणि टोप्या ५० ते २०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.

यंदा नुकसान भरपाईची अपेक्षा

दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वस्तू विक्रीतून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. रंग आणि गुलाल ३० टक्क्यांनी महाग झाले आहेत. विविध कंपन्यांचे रंग १० ते ५० ग्रॅम पॅकिंगमध्ये आहेत. बाजारात रिटेल खरेदी सुरू झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हर्बल गुलालाला सर्वाधिक मागणी

लोक आता आरोग्याप्रती सजग बनले आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि हर्बल गुलालाला जास्त मागणी आहे. आदमने गृह उद्योगाचे राहुल आदमने म्हणाले, हर्बल गुलाल ३० टक्के महाग झाला आहे. निर्मितीसाठी लागणारा आरारोट २६ रुपयांवरून ४३ रुपये, रंग १२०० वरून १६०० रुपये, ऑईल ४५ वरून ७० रुपये आणि मजुरी ३०० वरून ५०० रुपयांपर्यंत वाढली आहे. किरकोळ बाजारात गुलाल १०० ते १५० रुपये किलो विकला जात आहे. यंदा कोरोनाच्या धास्तीमुळे १ मार्चपासून गुलाल निर्मिती सुरू केली. कोरोनाआधी १०० टन गुलालाचे उत्पादन करायचो. पण यंदा ५० टन गुलाल तयार होईल. यावर्षी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. नागपुरात निर्मित गुलाल संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जातो.

टॅग्स :businessव्यवसायHoliहोळी 2022Socialसामाजिकnagpurनागपूरcolourरंग