शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

इव्हेंट उद्योगाला वर्षभरात ५०० कोटींचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 20:57 IST

event industry नागपुरातील इव्हेंट उद्योग मध्य भारतात प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून लग्नसमारंभ, वाढदिवस, कॉर्पोरेट व केंद्र व राज्य शासनाचे कार्यक्रम, प्रदर्शन, गरबा, दुचाकी व चारचाकी गाड्यांचे लॉन्चिंग याशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर महत्त्वाचा ठरतो आहे. सर्व कार्यक्रम वर्षभर होतात, पण मार्च, २०२० पासून सर्वच कार्यक्रम मर्यादित वेळेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने, इव्हेंट मॅनेजरची गरज भासत नाही. त्यामुळे नागपुरातील इव्हेंट उद्योग आणि त्याच्याशी जुळलेल्या ७० वेंडरचे वर्षभरात ५०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे व्यवसायाशी जुळले आहेत ७० वेंडर : २० हजार लोकांचा रोजगार बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील इव्हेंट उद्योग मध्य भारतात प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून लग्नसमारंभ, वाढदिवस, कॉर्पोरेट व केंद्र व राज्य शासनाचे कार्यक्रम, प्रदर्शन, गरबा, दुचाकी व चारचाकी गाड्यांचे लॉन्चिंग याशिवाय अन्य कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर महत्त्वाचा ठरतो आहे. सर्व कार्यक्रम वर्षभर होतात, पण मार्च, २०२० पासून सर्वच कार्यक्रम मर्यादित वेळेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होत असल्याने, इव्हेंट मॅनेजरची गरज भासत नाही. त्यामुळे नागपुरातील इव्हेंट उद्योग आणि त्याच्याशी जुळलेल्या ७० वेंडरचे वर्षभरात ५०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वच इव्हेंट मॅनेजरची कंबर मोडली आहे. सर्वच कार्यक्रम आणि लग्नकार्यही बंद आहेत. आता लग्नकार्यही २५ जणांच्या उपस्थितीत घरीच होत आहेत. मॉलमध्येही इव्हेंट बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायाशी जुळलेल्या २० हजार लोकांचा रोजगार बुडाला आहे. काम नसल्याने त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे.

इव्हेंट मॅनेजर म्हणाले, विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बाजारपेठांमध्ये एकाच वेळी शेकडो, हजारोंची गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी प्रशासनाला कार्यक्रमाच्या आयोजनला परवानगी देण्यास हरकत नाही. सर्व वस्तू सॅनिटाइज्ड करून आणू. गेल्या वर्षीचा सिझन वाया गेला. पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्नकार्य झाले, पण त्याकरिता लोकांना इव्हेंट मॅनेजरची गरज भासली नाही. शासकीय कार्यक्रम आणि प्रचाराची कामे इव्हेंट मॅनेजरला द्यावीत, असे निवेदन इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनने शासनाला दिले आहे, पण शासनानेही याकडे पाठ फिरविली आहे. कर्मचाऱ्यांना थोडे-फार वेतन देता येईल, अशी कामे शासनाने द्यावीत, अशी मागणी आहे.

मध्य भारतातील राज्यांमध्येही लॉकडाऊन असल्याने नागपुरातील इव्हेंट मॅनेजरला त्या ठिकाणी आयोजनासाठी जाता येत नाही. त्यामुळे सर्वांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. या वर्षीही संपूर्ण सिझन गेला आहे. पावसाळ्यानंतर जे कार्यक्रम होतील, त्यांची कामे मिळतील, याची गॅरंटी नाही. कोरोनाचा परिणाम पुढे वर्षभर राहणार असल्याने काम मिळण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे बँकांचे कर्ज आणि व्याजाचे हप्ते वाढत आहेत. सर्व बाजूने हा उद्योग संकटात असल्याचे इव्हेंट मॅनेजरने सांगितले.

वर्षभर कामाची गॅरंटी नाही

मार्च, २०२० पासून लहानमोठे इव्हेंटचे आयोजन बंद आहे. या वर्षीही अशीच स्थिती आहे. पुढे वर्षभर कामाची गॅरंटी नाही. त्यामुळे सर्वांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत थोडे-फार कामे मिळाली. आता कामगारांना वेतन देणे शक्य नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे.

प्रमोद बत्रा, अ‍ॅडमार्क इव्हेंट.

शासनाने उपक्रमाद्वारे मदत करावी

खासगी कामे बंद असल्याने शासनाने आपल्या उपक्रमांद्वारे इव्हेंट उद्योगाला मदत करावी. या संदर्भात शासनाला असोसिएशनतर्फे निवेदन दिले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या उद्योगांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या उद्योगाशी जुळलेल्या वेंडर व कामगारांना फटका बसला आहे.

विशेष अग्रवाल, विशेष वेडिंग कंपनी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय