शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

५० हजार घरे अन् ५० हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: March 7, 2016 02:41 IST

उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे.

नितीन गडकरी : महिला उद्योेजिका मेळाव्याचे उद्घाटननागपूर : उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे. या प्रकल्पांत २५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून गरिबांसाठी ५० हजार घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.महापालिकेचा समाजकल्याण विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून कस्तूरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रश्मी फडणवीस, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर आदी उपस्थित होते. शहराचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहराचा चौफेर विकासही होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे’(शहरी) राबविली जात आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्व्हे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील ५० हजार गरीब लोकांना माफक दरात घरे दिली जाणार आहेत. कार्यक्रमात ज्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी विपरीत परिस्थितीत न डगमगता व्यवसाय करून आपल्या मुलांना घडविले. संकटावर मात करण्याचा निश्चय केला तर त्यात आपण यशस्वी होतो. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्यासोबत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातूनच महिलांना रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आल्याची माहिती प्रवीण दटके यांनी दिली. महिला उद्योजका मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद असून एक तासात २०० स्टॉलचे बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजिका सरोज पोळ, रंजना गणवीर, मंगला राहाटे, भक्ती आमटे, माया शेंडे, अर्चना बन्सोड, शालिनी सक्सेना, मंगला महाजन, सुजाता वासनिक व संघमित्रा चव्हाण आदींचा सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रश्मी फडणवीस यांनी प्रस्ताविकातून महिला उद्योजिका मेळाव्याची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार ज्योत्स्ना देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)अडचणीवर मात करून चारचौघींना रोजगारमहिला बचत गटातील महिलांनी अडचणीवर मात करून आपल्यासोबतच चारचौघींना रोजगार उपलब्ध केला आहे. व्यवसाय व कु टुंबाचा समन्वय साधून या महिलांना पुढे जावे लागत आहे. महिलांना सर्व आघाड्यावर लढताना मानसिक ताण येतो. परंतु संकटात न डगमगता प्रगती करा असे आवाहन सोनाली कुलक र्णी यांनी केले.