शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

५० हजार घरे अन् ५० हजार लोकांना रोजगार

By admin | Updated: March 7, 2016 02:41 IST

उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे.

नितीन गडकरी : महिला उद्योेजिका मेळाव्याचे उद्घाटननागपूर : उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. मेट्रो रेल्वे, एम्स, आयआयटी,उड्डाणपूल असे प्रकल्प उभे राहात आहे. या प्रकल्पांत २५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून गरिबांसाठी ५० हजार घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.महापालिकेचा समाजकल्याण विभाग व महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून कस्तूरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रश्मी फडणवीस, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर आदी उपस्थित होते. शहराचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. शहराचा चौफेर विकासही होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ‘सर्वांसाठी घरे’(शहरी) राबविली जात आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्व्हे सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरातील ५० हजार गरीब लोकांना माफक दरात घरे दिली जाणार आहेत. कार्यक्रमात ज्या महिलांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी विपरीत परिस्थितीत न डगमगता व्यवसाय करून आपल्या मुलांना घडविले. संकटावर मात करण्याचा निश्चय केला तर त्यात आपण यशस्वी होतो. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्यासोबत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातूनच महिलांना रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गटाकडे सोपविण्यात आल्याची माहिती प्रवीण दटके यांनी दिली. महिला उद्योजका मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद असून एक तासात २०० स्टॉलचे बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उद्योजिका सरोज पोळ, रंजना गणवीर, मंगला राहाटे, भक्ती आमटे, माया शेंडे, अर्चना बन्सोड, शालिनी सक्सेना, मंगला महाजन, सुजाता वासनिक व संघमित्रा चव्हाण आदींचा सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रश्मी फडणवीस यांनी प्रस्ताविकातून महिला उद्योजिका मेळाव्याची माहिती दिली. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार ज्योत्स्ना देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)अडचणीवर मात करून चारचौघींना रोजगारमहिला बचत गटातील महिलांनी अडचणीवर मात करून आपल्यासोबतच चारचौघींना रोजगार उपलब्ध केला आहे. व्यवसाय व कु टुंबाचा समन्वय साधून या महिलांना पुढे जावे लागत आहे. महिलांना सर्व आघाड्यावर लढताना मानसिक ताण येतो. परंतु संकटात न डगमगता प्रगती करा असे आवाहन सोनाली कुलक र्णी यांनी केले.