शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

५० हजारांवर धोकादायक वाहने रस्त्यावर

By admin | Updated: August 31, 2015 02:38 IST

जुनाट व कालबाह्य झालेल्या वाहनांना रंगरंगोटी करून ती वाहने वाहतुकीसाठी वापरात आणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार नागपुरात सर्रास सुरू आहेत.

लोकमत विशेषयोग्यता प्रमाणपत्राशिवाय धावतात वाहने : जीवाशी खेळण्याचा सर्रास प्रकारसुमेध वाघमारे  नागपूरजुनाट व कालबाह्य झालेल्या वाहनांना रंगरंगोटी करून ती वाहने वाहतुकीसाठी वापरात आणून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार नागपुरात सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, शहरातील ट्रक, टँकर, कचरा उचलणारी वाहने, ट्रेलर, बस, आॅटोरिक्षा, सहासीटर आदी प्रकारच्या सुमारे ५० हजाराच्यावर वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वार्षिक तपासणी (पासिंग) करून घेऊन योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. चौकाचौकात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून व आरटीओकडून कारवाई होत नसल्याने ही धोकादायक वाहने अपघाताला आमंत्रण देत आहे.गेल्या १० वर्षांत नागपूरची लोकसंख्या सुमारे ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याच्या तुलनेत खासगी वाहनांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हे वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. २०१२ मध्ये शहरात वाहनांची संख्या ११ लाख ५७ हजार ३४ होती, मागील वर्षापर्यंत ही संख्या पावणेतेरा लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आता १४ लाख ३८ हजारांवर गेली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटोरिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे ५० हजार वाहनांनी पासिंगच केले नसल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे वाहनांचा ब्रेक फेल होणे, टायर फुटणे, अचानक इंजिनमधील बिघाड होऊन रस्त्याच्या मधोमध वाहन थांबणे, आदी प्रकारांमुळे अपघातांची व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेतलेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना दिलेली वाहने दिवस-रात्र सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे ही वाहने सुस्थितीत आहेत की नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. पासिंग संपताच मिळते नोटीसपासिंग संपलेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयाकडून नोटीस पाठविले जाते. त्यानंतरही कोणी पासिंग करवून घेत नसेल तर आॅटोला वर्षाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड तर इतर वाहनांसाठी १२ ते १५ हजार रुपयांपर्यंत दंड आहे. याशिवाय आरटीओच्या वायू पथकांकडून वेळोवेळी रस्त्यावर वाहनांची तपासणी करून वाहने तपासली जातात. -विजय चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर