शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृत विद्यापीठाला ५० एकर जागा

By admin | Updated: November 23, 2015 02:24 IST

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९७ साली रामटेक येथे कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : विद्यापीठाच्या विद्याशाखांचा होणार विस्तारनागपूर : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी १९९७ साली रामटेक येथे कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उद्घाटन केले. ते विद्यापीठ आजतागायत रामटेक येथेच असून भविष्यातही विद्यापीठाचा संपूर्ण कारभार आणि शैक्षणिक कार्य रामटेक येथूनच होणार आहे. या विद्यापीठाचा विस्तार करण्यासाठी आणि काही नव्या विद्याशाखा निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने केलेल्या विनंतीप्रमाणे शासनातर्फे नागपूर जवळील कालाडोंगरी येथे विद्यापीठाला ५० एकर जागा प्रदान करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कालिदास महोत्सवात आयोजित पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शासनाला विद्यापीठाने जागा मागितली होती. वेगवेगळ्या विद्याशाखांचा विस्तार करण्यासाठी शासनाने ५० एकर जागा विद्यापीठाला दिली आहे. रामटेकमध्ये अकॅडमिक स्कूल, मॉडेल कॉलेज आणि रिसर्च सेंटर असेल. त्याप्रमाणेच नागपुरातही अकॅडमिक स्कूल, मॉडेल कॉलेज, रिसर्च सेंटर, लँग्वेज हब, संस्कृत, पाली आणि इतर भाषांचे संग्रहालय असेल. विद्यापीठात देशातील अनेक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात सहभागी होतात. त्यांच्यासाठी केंद्र म्हणून विद्यापीठाची उपशाखा नागपुरात कार्य करते. पण विद्यापीठाला उपशाखेचा कारभार चालविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने विद्यापीठाने शासनाकडे जागेची मागणी केली होती. त्याप्रमाणे विद्यापीठाला कालाडोंगरी येथे ५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. शासनाला करण्यात आलेली मागणी पूर्ण केली आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री व्यस्त असल्याने कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत परिषदेला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांच्यावतीने ५० एकर जागा प्रदान करण्याचे परिपत्रक विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांना जाहीरपणे प्रदान केले. (प्रतिनिधी)