शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर

By admin | Updated: July 7, 2016 03:00 IST

महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला..

शासनाचा निर्णय : राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मिळणार निधीराकेश घानोडे नागपूर ‘महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.२०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेकरिता ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत राज्य विधी सेवा प्राधिकरणने शासनाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाने ४८ लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार मागणीपत्र सादर झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी २ लाख, अ‍ॅसिड हल्ला झाल्यास ३ लाख तर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्यात येते. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य विधी सेवा प्राधिकरणची आहे. भरपाई मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज सादर करावा लागतो. जिल्हा प्राधिकरणने नुकसान भरपाई नाकारल्यास याविरुद्ध ९० दिवसांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरणकडे अपील करता येते. केंद्र शासन, राज्य शासन, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि आयकरदाते यांना वगळून इतर सर्वजण योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.