शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर

By admin | Updated: July 7, 2016 03:00 IST

महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला..

शासनाचा निर्णय : राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मिळणार निधीराकेश घानोडे नागपूर ‘महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.२०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेकरिता ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत राज्य विधी सेवा प्राधिकरणने शासनाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाने ४८ लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार मागणीपत्र सादर झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी २ लाख, अ‍ॅसिड हल्ला झाल्यास ३ लाख तर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्यात येते. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य विधी सेवा प्राधिकरणची आहे. भरपाई मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज सादर करावा लागतो. जिल्हा प्राधिकरणने नुकसान भरपाई नाकारल्यास याविरुद्ध ९० दिवसांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरणकडे अपील करता येते. केंद्र शासन, राज्य शासन, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि आयकरदाते यांना वगळून इतर सर्वजण योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.