शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

गुन्ह्यांत बळी पडलेल्यांसाठी ४८ लाख मंजूर

By admin | Updated: July 7, 2016 03:00 IST

महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला..

शासनाचा निर्णय : राज्य विधी सेवा प्राधिकरणाला मिळणार निधीराकेश घानोडे नागपूर ‘महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना’ याअंतर्गत शासनाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणला ४८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.२०१६-१७ वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेकरिता ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेंतर्गत राज्य विधी सेवा प्राधिकरणने शासनाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु, शासनाने ४८ लाख रुपये मंजूर केले असून उर्वरित निधी आवश्यकतेनुसार मागणीपत्र सादर झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३५७-क अनुसार गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची आहे. यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहकार्याने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत जीवित हानीसाठी २ लाख, अ‍ॅसिड हल्ला झाल्यास ३ लाख तर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये भरपाई देण्यात येते. याशिवाय अंत्यसंस्कारासाठी २००० व वैद्यकीय उपचारासाठी कमाल १५ हजार रुपये खर्च देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य विधी सेवा प्राधिकरणची आहे. भरपाई मिळवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे अर्ज सादर करावा लागतो. जिल्हा प्राधिकरणने नुकसान भरपाई नाकारल्यास याविरुद्ध ९० दिवसांमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरणकडे अपील करता येते. केंद्र शासन, राज्य शासन, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि आयकरदाते यांना वगळून इतर सर्वजण योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत.