शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

४७ एकरातील गहू खाक

By admin | Updated: March 29, 2017 02:53 IST

शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही

१५० एकरात आग पसरली : खोपडी शिवारातील घटना तारसा : शेतकऱ्याने त्याच्या शेतातील पालापाचोळा व कचरा जाळला. मात्र, वाढते तापमान व जोरात वाहणारी हवा यामुळे ही आग परिसरातील शेतात पसरली. आटोकाट प्रयत्न करूनही ही आग नियंत्रणात न आल्याने अल्पावधीत या आगीने १५० एकर शेतीचा परिसर कवेत घेतला. त्यामुळे ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले असून, उर्वरित १०३.५ एकरातील तणस, जनावरांचा चारा आणि पालापाचोळा जळाला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. ही घटना मौदा तालुक्यातील खोपडी शिवारात मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. सध्या गव्हाचे पीक कापणीला आले असून, काहींनी शेतातील गव्हाच्या पिकाची कापणीही केली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतीच्या खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. शेताची साफसफाई करण्याच्या उद्देशाने खोपडी शिवारातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याच्या शेतात पालापाचोळा जाळला. जोरात वाहणारी हवा आणि वाढलेले तापमान यामुळे ही आग त्याच्याच शेतातील कापणी केलेल्या गव्हाचे खुंटापर्यंत पसरली. पुढे ही आग पसरतच गेली. आग वेळीच नियंत्रणात न आल्याने साईबाबा कोरकंचू (५०, रा. हनुमाननगर) ३.५ एकर, कशी इगडपुगट्टी (४१, रा. खेडी) यांच्या ६ एकर, प्रभाकर वासनिक (३५, रा. खेडी) यांच्या २ एकर, सुभाष वासनिक (३६, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, मनोज कडू ( ३०, रा. खेडी) यांच्या १२ एकर, प्रभाकर मेश्राम ( ४१, रा. खेडी) यांच्या ३.५ एकर, प्रदीप वासनिक (३०, रा. खेडी) यांच्या ३ एकर, अशोक वासनिक (४०, रा. खेडी) यांच्या २ एकर, जयदेव गजभिये (५१, रा. खेडी) यांच्या ४ एकर, रामकृष्ण नादेला (४१, रा. खेडी) यांच्या २ एकर आणि जयदेव गजभिये (४५, रा. नागपूर) यांच्या ५ एकर अशा एकूण ४६.५ एकरातील कापणीला आलेले गव्हाचे उभे पीक राख झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्या तोंडचा घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. हाती आलेले पीक गेल्याचे दु:ख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. (वार्ताहर)