शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

मनपाला मिळणार ४४ कोटीचे अनुदान

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे.

आर्थिक हातभार : स्टॅम्प ड्युटीतून एलबीटीची वसुली कायमनागपूर : ५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे. काही प्रमाणात एलबीटी हटविल्याच्या मोबदल्यात महापालिकेला राज्य सरकारकडून दर महिन्याला अनुदान स्वरुपात ४४ कोटी मिळण्याची आशा आहे. सोबतच मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून एक टक्का एलबीटी कायम राहणार आहे. यातून पाच कोटी व तसेच ५० कोटीहून अधिक व्यापार असलेल्या व्यापाऱ्यांकडून ७ कोटी व ४४ कोटी असे महिन्याला ५६ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षात जकात व एलबीटीच्या माध्यमातून ज्या वर्षात सर्वाधिक उत्पन्न झाले. ते गृहीत धरून सरकारकडून त्या आधारावर अनुदान मिळणार आहे. २०१२-१३ या वर्षात जकातीपासून सर्वाधिक ४८५ कोटीचे उत्पन्न झाले होते. यात ८ टक्के वाढ गृहीत धरता ५२४ कोटी होतात. या आधारे मनपाला दर महिन्याला ४४ कोटी अनुदान मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरेसे अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पूर्ण केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. विधानसभेत पाच महिन्यासाठी २०४०. ४४ कोटीच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम २५ महापालिकांना अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून गेल्या वर्षात मनपाला ६० कोटीचे उत्पन्न झाले होते. त्यावरील एलबीटी कायम असल्याने महिन्याला पाच कोटी मिळतील. जकातीच्या आधारे अनुदान मिळणार असल्याने मनपाची र्आिर्थक स्थिती चांगली होईल. असा विश्वास सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. यातून एलबीटीचे नुकसान भरून निघणार असल्याने तिवारी व सिंगारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अभय योजनेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यानंतर एलबीटी रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु या संदर्भात मनपाला सरकारच्या निर्देशाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)