शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:33 IST

राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.

ठळक मुद्देलोक न्यायालयएकूण २ हजार ७२५ प्रलंबित प्रकरणे संपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये रविवारी घड्याळ चोरीचा ४३ वर्षे जुना खटला फिर्यादी विजय साहू यांच्या सामंजस्यामुळे निकाली निघाला. साहू यांनी या प्रकरणातील तक्रार मागे घेतली.साहू हे एम्प्लॉयमेंट कार्ड काढण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असताना रमेश नावाच्या आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने तो साहू यांच्या वडिलांचा साळा असल्याची खोटी माहिती दिली. दरम्यान, आरोपीने साहू यांची घड्याळ चोरली. याचा खटला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी बी. डी. तारे यांच्या न्यायालयात प्रलंबित होता. हा खटला तडजोडीसाठी न्याय दंडाधिकारी शहजाद परवेझ यांच्या पॅनलसमक्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर साहू यांनी फिर्याद मागे घेऊन खटला संपवला. राष्ट्रीय लोक न्यायालयात या प्रकरणासह जिल्ह्यातील एकूण २ हजार ७२५ प्रकरणे सामंजस्याने संपविण्यात आली. त्यात १ हजार २१८ दिवाणी, फौजदारी व भूसंपादन वादाची प्रकरणे, ६०० मोटार वाहन कायदा प्रकरणे तर, ९०७ वादपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.मोटार अपघात दावा न्यायाधिकरणचे न्यायाधीश एस. डी. दरणे यांच्या न्यायालयातील दोन प्रकरणे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश वाय. बी. येणुरकर यांच्या पॅनलसमक्ष निकाली निघाली. एका प्रकरणात दावेदार कविता बजाज यांना टाटा एआयजी इन्शुरन्सकडून ३२ लाख तर, अनिता बडे यांना फ्युचर जनरल इन्शुरन्सकडून ३० लाख रुपये भरपाई मिळाली. धनादेश अनादराची ४२० प्रकरणे निकाली निघाली. एका प्रकरणात श्रीराम चिटस् कंपनीला विनोद खुराणा यांच्याकडून ९ लाख ५६ हजार ६२७ रुपये मिळाले. प्रकरणे ऐकण्यासाठी ६२ पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, एक वकील व एक समाजसेवकाचा समावेश होता. उच्च न्यायालयातील प्रकरणे हाताळण्यासाठी न्या. रोहित देव, न्या. मनीष पितळे व सेवानिवृत्त न्या. एस. आर. डोणगावकर यांचे पॅनल्स तयार करण्यात आले होते. प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, न्या. व्ही. बी. कुळकर्णी, न्या. धनराज काळे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.वडिलाच्या मृत्यूनंतर मुलाचा पुढाकारफिर्यादी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलाने तडजोडीसाठी पुढाकार घेतल्यामुळे ३८ वर्षे जुने विश्वासघाताचे प्रकरण निकाली निघाले. यातील पांडुरंग नावाच्या आरोपीने फिर्यादीकडून किरायाने घेतलेली सायकल परस्पर विकली होती. यासंदर्भातील खटला आतापर्यंत प्रलंबित होता.

टॅग्स :Courtन्यायालय