शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयोगाकडे ४१ हजार अपील !

By admin | Updated: December 6, 2015 02:56 IST

राज्य माहिती आयोगाच्या राज्यभरातील विविध खंडपीठांकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढीस लागली आहे.

५९ टक्के द्वितीय अपील निकाली : ६ हजार प्रकरणांत निर्णयांची अंमलबजावणीच नाहीनागपूर : राज्य माहिती आयोगाच्या राज्यभरातील विविध खंडपीठांकडे येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढीस लागली आहे. २०१४ या वर्षात माहिती आयोगाकडे द्वितीय अपिलाची ४१ हजारांहून अधिक अपिलं आली. मागील वर्षातील तसेच संबंधित वर्षातील मिळून ५९ टक्के प्रकरणेच निकाली काढण्यात आली व ४१ टक्के प्रकरणे प्रलंबित होती. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात राज्य माहिती आयोगाकडेच विचारणा केली होती. २०१४ या वर्षात आयोगाला किती द्वितीय अपिलं प्राप्त झाली व त्यातील किती प्रकरणांवर सुनावणी झाली. तसेच आयोगाच्या खंडपीठांनी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या, या प्रश्नांचा समावेश होता.निर्णयाची अंमलबजावणीच नाहीनागपूर : माहिती आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आठ माहिती आयुक्तांकडे जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ४१ हजार ६४५ अपिलं आली. २०१३ अखेरीस प्रलंबित असलेली २९ हजार ३४४ अपिलं होती. म्हणजेच २०१४ साली विविध माहिती आयुक्तांना ७० हजार ९८९ प्रकरणांवर सुनावणी करायची होती. परंतु यापैकी ४२ हजार ३८४ म्हणजेच ५९ टक्के अपिलं निकाली काढण्यात आली, तर २८ हजार ६०५ अपिलं प्रलंबित होती.माहिती आयोगाच्या खंडपीठांतर्फे देण्यात येणाऱ्या निर्णयाची अनेकदा अंमलबजावणी होत नाही. यासंबंधात माहितीचा अधिकार २००५ मधील कलम १८ नुसार राज्य माहिती आयोगाकडे तक्रार प्राप्त करता येते. २०१४ या वर्षात अशाप्रकारच्या ५,७७० तक्रारी प्राप्त झाल्या. २०१३ च्या प्रलंबित तक्रारींची संख्या ३,३३८ इतकी होती. यापैकी ६,०४२ तक्रारींची सुनावणी करण्यात आली, तर वर्षअखेरीस ३,०६६ प्रकरणे प्रलंबित होती.