शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांअभावी एसटीच्या ४० टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी ...

नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी बहुतांश प्रवासी घराबाहेर पडले नाही. परिणामी एसटीच्या नागपूर विभागात ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यामुळे नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी शहरात बंद पाळण्यात येत असल्यामुळे शनिवारपासूनच खऱ्या अर्थाने लॉकडाऊन सुरू झाले आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर झाला आहे. शनिवारी प्रवासी कमी संख्येने घराबाहेर पडले. लॉकडाऊनच्या निर्णयापूर्वी नागपूर विभागात ४०० बसेस धावत होत्या. या बसेस १ लाख ४० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करीत होत्या. विभागाला एका दिवशी ४२ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु शनिवारी प्रवासी घराबाहेर न पडल्यामुळे नागपूर विभागात केवळ २६० बसेस धावल्या. केवळ ८० हजार किलोमीटर अंतर या बसेसने पूर्ण केले. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विभागाला केवळ २२ लाख उत्पन्न मिळाले. शनिवारी नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी बसणार आहेत. त्यामुळे हे उत्पन्न आणखी कमी होणार असून एसटीचा तोटा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

................

प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या रद्द

‘शनिवारी नागपूर विभागात प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी महामंडळाला ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यात विभागाचे २० लाखाचे नुकसान झाले आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

...........