शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

प्रवाशांअभावी एसटीच्या ४० टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी ...

नागपूर : प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बंद असल्यामुळे शनिवारी बहुतांश प्रवासी घराबाहेर पडले नाही. परिणामी एसटीच्या नागपूर विभागात ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यामुळे नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी शहरात बंद पाळण्यात येत असल्यामुळे शनिवारपासूनच खऱ्या अर्थाने लॉकडाऊन सुरू झाले आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर झाला आहे. शनिवारी प्रवासी कमी संख्येने घराबाहेर पडले. लॉकडाऊनच्या निर्णयापूर्वी नागपूर विभागात ४०० बसेस धावत होत्या. या बसेस १ लाख ४० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करीत होत्या. विभागाला एका दिवशी ४२ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु शनिवारी प्रवासी घराबाहेर न पडल्यामुळे नागपूर विभागात केवळ २६० बसेस धावल्या. केवळ ८० हजार किलोमीटर अंतर या बसेसने पूर्ण केले. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विभागाला केवळ २२ लाख उत्पन्न मिळाले. शनिवारी नागपूर विभागाला २० लाखांचा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी बसणार आहेत. त्यामुळे हे उत्पन्न आणखी कमी होणार असून एसटीचा तोटा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

................

प्रवासी नसल्यामुळे फेऱ्या रद्द

‘शनिवारी नागपूर विभागात प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे एसटी महामंडळाला ४० टक्के फेऱ्या रद्द करण्याची पाळी आली. यात विभागाचे २० लाखाचे नुकसान झाले आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

...........