शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

तरुणांमध्ये ४० टक्क््यांनी वाढले उच्चरक्तदाबाचे प्रमाण

By सुमेध वाघमार | Updated: May 16, 2024 14:34 IST

Nagpur : ताणतणाव व जीवनशैली ठरतेय मुख्य कारण; जागतिक उच्चरक्तदाब दिन विशेष

नागपूर : बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ताणतणाव युक्त जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच उच्चरक्तदाबाचे रुग्ण दिसून येत आहेत.  तरुणांमध्ये या विकाराची ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. उच्चरक्तदाबाच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधूमेह असतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी व्यक्त केले.   

१७ मे हा दिवस जगभरात उच्चरक्तदाब दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. बीडकर म्हणाले, उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसत नाही. अशास्थितीत एखाद्या रुग्णाच्या अवयवांपर्यंत जास्त दाबाने रक्त प्रवाहित होत असल्यास अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते.

-अनियंत्रित रक्तदाबामुळे वाढते गुंतागुतअनियंत्रित रक्तदाबामुळे अनेक गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. मेंदूला आघात होऊन पक्षाघात आणि रक्तस्त्राव अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्यांना हानी होऊन दृष्टी देखील जाऊ शकते. मुत्रपिंड निकामी होऊ शकतात. हृदय, रक्तवाहिन्या अशा रक्ताभिसरण प्रक्रियेतील अवयवांचे कार्यान्वयन गडबडून हृदयविकार देखील संभवतात. शिवाय उच्चरक्तदाब विकारासोबत मधूमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेले युरिक अ‍ॅसिड अशा समस्यांना देखील निमंत्रण मिळते. त्याशिवाय उच्चरक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलचा विकार, २५ टक्के रुग्णांना युरिक अ‍ॅसिड वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास होतो. त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवला तर अन्य विकारांपासून दूर राहता येते.

-हायपरटेन्शन म्हणजे काय?उच्चरक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन. प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य रक्तदाब १२०/८० असतो. या संख्येत किंचीत चढ-उतार होऊ शकतात. परंतु जर रक्तदाब हा वारंवार १४०/९० पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ उच्चरक्तदाबाची शक्यता असते. 

-उच्चरक्तदाब टाळण्यासाठी हे करारक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफुड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावे. वरून मीठ घेणे देखील टाळावे. नियमित व्यायाम करावा. मात्र, एवढे पुरेसे नसते; औषधोपचरांनी रक्तदाब नियंत्रणात आणावा लागतो.  जीवनशैलीतील बदल देखील अत्यंत आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण तेवढेच महत्त्वाचे आहे. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.

-रक्तदाब मोजण्याचा संकल्प कराकोविड असो वा अन्य कुठलेही विकार, उच्चरक्तदाबग्रस्त व्यक्तींना सर्वाधिक जोखिम असते. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर गुंतागूंत टाळता येतो. त्यासाठी वषार्तून किमान एकदा स्वत:चा रक्तदाब मोजून घेण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण रक्तदाब नियंत्रणा तर जीवन सुदृढ.-डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :diabetesमधुमेहHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग