शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

तरुणांमध्ये ४० टक्क््यांनी वाढले उच्चरक्तदाबाचे प्रमाण

By सुमेध वाघमार | Updated: May 16, 2024 14:34 IST

Nagpur : ताणतणाव व जीवनशैली ठरतेय मुख्य कारण; जागतिक उच्चरक्तदाब दिन विशेष

नागपूर : बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ताणतणाव युक्त जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच उच्चरक्तदाबाचे रुग्ण दिसून येत आहेत.  तरुणांमध्ये या विकाराची ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. उच्चरक्तदाबाच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधूमेह असतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी व्यक्त केले.   

१७ मे हा दिवस जगभरात उच्चरक्तदाब दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. बीडकर म्हणाले, उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसत नाही. अशास्थितीत एखाद्या रुग्णाच्या अवयवांपर्यंत जास्त दाबाने रक्त प्रवाहित होत असल्यास अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते.

-अनियंत्रित रक्तदाबामुळे वाढते गुंतागुतअनियंत्रित रक्तदाबामुळे अनेक गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. मेंदूला आघात होऊन पक्षाघात आणि रक्तस्त्राव अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डोळ्यांना हानी होऊन दृष्टी देखील जाऊ शकते. मुत्रपिंड निकामी होऊ शकतात. हृदय, रक्तवाहिन्या अशा रक्ताभिसरण प्रक्रियेतील अवयवांचे कार्यान्वयन गडबडून हृदयविकार देखील संभवतात. शिवाय उच्चरक्तदाब विकारासोबत मधूमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेले युरिक अ‍ॅसिड अशा समस्यांना देखील निमंत्रण मिळते. त्याशिवाय उच्चरक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या बॅड कोलेस्ट्रॉलचा विकार, २५ टक्के रुग्णांना युरिक अ‍ॅसिड वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास होतो. त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणात ठेवला तर अन्य विकारांपासून दूर राहता येते.

-हायपरटेन्शन म्हणजे काय?उच्चरक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन. प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य रक्तदाब १२०/८० असतो. या संख्येत किंचीत चढ-उतार होऊ शकतात. परंतु जर रक्तदाब हा वारंवार १४०/९० पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ उच्चरक्तदाबाची शक्यता असते. 

-उच्चरक्तदाब टाळण्यासाठी हे करारक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडीत आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफुड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावे. वरून मीठ घेणे देखील टाळावे. नियमित व्यायाम करावा. मात्र, एवढे पुरेसे नसते; औषधोपचरांनी रक्तदाब नियंत्रणात आणावा लागतो.  जीवनशैलीतील बदल देखील अत्यंत आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण तेवढेच महत्त्वाचे आहे. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.

-रक्तदाब मोजण्याचा संकल्प कराकोविड असो वा अन्य कुठलेही विकार, उच्चरक्तदाबग्रस्त व्यक्तींना सर्वाधिक जोखिम असते. मात्र, रक्तदाब नियंत्रणात ठेवला तर गुंतागूंत टाळता येतो. त्यासाठी वषार्तून किमान एकदा स्वत:चा रक्तदाब मोजून घेण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण रक्तदाब नियंत्रणा तर जीवन सुदृढ.-डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :diabetesमधुमेहHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग