शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

जिल्हा योजनेत ४० कोटींनी वाढ मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला:विकासाला मिळणार बळ

By admin | Updated: March 5, 2015 01:52 IST

गृह जिल्ह्याच्या विकास योजनेत वाढ करून देण्याबाबत दिलेले आश्वासन

नागपूर : गृह जिल्ह्याच्या विकास योजनेत वाढ करून देण्याबाबत दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळले आहे. २५० कोटींच्या योजनेत आता ४० ते ४१ कोटींने वाढ करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ही योजना आता २९० ते २९१ कोटींवर जाणार आहे.जिल्हा नियोजन समितीने नागपूर जिल्ह्यासाठी २०१५-१६ या वर्षासाठी पाठविलेल्या ४०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या योजनेपैकी अर्थमंत्र्यांनी २५० कोटी रुपयांच्या जिल्हा विकास योजनेस मान्यता दिली होती. ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत फक्त २५ कोटी रुपयेच असल्याने राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असतानाही जिल्हा विकास योजनेत तुटपुंजी वाढ झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर टीका केली होती तर भाजपचे आमदारही अत्यल्प वाढीमुळे खूश नव्हते. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनाचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकास निधी २५० वरून ३०० कोटींपर्यंत वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करून यासंदर्भात निर्माण झालेल्या नाराजीकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्याच्या निधीत निश्चित वाढ केली जाईल, असे सांगितले होते. मात्र घोषणा केली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री निधीत किती कोटींची भर घालतात याकडे लक्ष लागले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९० ते २९१ कोटी रुपयांच्या जिल्हा विकास योजनेला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ही वाढ ४० ते ४१ कोटी रुपये एवढी आहे. पालकमंत्र्यांनी ५० कोटी वाढवून मागितले व मुख्यमंत्र्यांनी ४० ते ४१ कोटींची वाढ केली हे यातून दिसून येते. या निमित्ताने निधी वाढवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केले आहे. जिल्हा विकास निधीतून जास्तीत जास्त रक्कम शहर विकासावर खर्च करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या सूचनेचे पालन पालन करताना मात्र नियोजन समितीला कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)