शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

यवतमाळात होणार ३६९ नव्या गावांचा उदय

By admin | Updated: July 4, 2014 01:06 IST

जिल्हयातील अनेक वस्त्या पेसा (अनुसूचित विस्तार कार्यक्रम) कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वाड्या, वस्त्या आणि पोडांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

पेसा कायदा : वाड्या, वस्त्या, पोडांना मिळणार स्वतंत्र ओळखरूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्हयातील अनेक वस्त्या पेसा (अनुसूचित विस्तार कार्यक्रम) कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वाड्या, वस्त्या आणि पोडांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे या गावांना नवीन ओळख मिळणार आहे. पंचायत विभागाने २ जुलैला विशेष बैठक बोलावली आहे. त्या अनुषगांने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.पेसा कायद्याने आदिवासी वसाहतींना विशेष अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात पेसा कायद्यात मोडणाऱ्या १६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीला ३६९ वस्त्या आहेत. झरी, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव तालुक्यात ह्या वस्त्या आहे. पेसा ग्राम पंचायतीमधील सरपंचांना यापूर्वीच कायद्याच्या अंमलबजावनीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आता पेसा कायद्यात गावांना विशेष अधिकार बहौल केले आहे. मात्र पेसा कायद्यातील वसाहती सर्वसामांन्य गावाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे या ठिकाणी विकास कामांसाठी येणारा निधी इतर ठिकाणी खर्ची घातला जातो. याचा फायदा पेसा कार्यक्षेत्रातील आदिवासी बांधवाना होत नाही.नव्या अधिसूचनेनुसार पेसा गावाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३६९ वस्तत्यांना स्वतंत्र गाव म्हणून घोषित करता येणार आहे. पेसा नियमावलीच्या कलम ४ नुसार हा विशेष अधिकार बहाल करण्यात आला आहे. वस्तीमधील एकूण लोकसंखेच्या ५० टक्के नागरिकांनी स्वतंत्र गाव हवे असा ठराव घेणे अनिवार्य आहे. हा नियम ५० लोकवस्तीच्या वस्तीला लागू होणार आहे. अधिसूचनेतील दुरूस्तीबाबत माहिती देण्यासाठी पंचायत विभागाने २ जुलैला बैठक आयोजित केली आहे. विशेष ग्रामसभा लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.